शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Narayan Rane PC: “मी गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मग, आताही...”: नारायण राणेंचा शिवसेनेला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:43 IST

आम्ही यापुढे कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यात जे जे होते ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही असंही सूचक इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी अटकेच्या प्रकरणावर शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. संजय राऊत(Sanjay Raut) हे संपादकीय पदाच्या लायकीचे नाहीत. शिवसेनेने मला मुख्यमंत्री केले, मी गँगस्टर असेल तर मुख्यमंत्री केले. आत्ताही तेच असतील. मी १७ तारखेनंतर राऊतांना उत्तर देईन असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिला आहे.

"मी सगळ्यांना पुरून उरलोय; तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत का?"

नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, सामाना अग्रलेखात उद्धव ठाकरेंना खुश करण्यापुरत लिहिलं जातं. मला वाटत नाही त्यावर मी प्रतिक्रिया द्यावी. शिवसेनेने(Shivsena) मुख्यमंत्री पद दिलं कारण कतृत्व होतं ते सिद्ध करून दाखवलं. आता कुणी कतृत्वान आहे का? हे सरकार कायम स्वरुपी नाही. कुछ दिनो के मेहमान आहे. गँगस्टर असताना शिवसेनेने मला मुख्यमंत्री केले, मग आताही मंत्री तेच असतील ना असं राणेंनी सांगितले. शिवसेना नेत्यांनी कधी असे शब्द उच्चारले नाहीत का? मी कुणालाही घाबरत नाही. मी सगळ्यांना पुरून उरलोय. मी आता यापुढे जपून पावलं उचलणार आहे. आम्ही तिघं घरात नसताना आंदोलन केले. तुम्हाला घर नाहीत? मुलंबाळं नाहीत का? असा सवालही राणेंनी विचारला.

पवारसाहेब, काय सज्जन मुख्यमंत्री केलाय तुम्ही

१ ऑगस्टला बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं उद्घाटन होतं. शिवसेना नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? देशाबद्दल अभिमान आहे म्हणून मी संतापाने बोललो. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणतात, शिवसेना भवनाबद्दल कुणी काही बोललं तर थोबाड फोडा हे आदेश नाहीत का? हा योगी आहे की ढोंगी, चप्पलाने मारले पाहिजे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चप्पलाने मारलं हे शब्द वापरलेले चालतात? केंद्रीय मंत्री अमित शाह यांना निर्लज्ज असा शब्द वापरला ते चालतं का? असा सवाल विचारत पवारसाहेब काय सज्जन मुख्यमंत्री केलाय तुम्ही असंही नारायण राणेंनी चिमटा काढला.

ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही

अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतात पकडा त्यांना, काही दरोडा घातलाय का? राज्यात कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? दिशा सालियानच्या आत्महत्येत कोण मंत्री उपस्थित होतं? का त्याचा छडा लागला नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काय घडलं? कुठल्या मंत्र्याला अटक केली? आम्ही यापुढे कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यात जे जे होते ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही असंही सूचक इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना