शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Cabinet Reshuffle: इतिहासात जे कधीच घडलं नाही ते नरेंद्र मोदींनी ‘करून दाखवलं’; मंत्रिमंडळ फेरबदलात काय आहे स्पेशल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:58 IST

PM Narendra Modi Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदलात प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक भागांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. १२ ओबीसी प्रतिनिधित्व असेल. छोट्या समुदायांनाही या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

ठळक मुद्देराज्यातून नारायण राणे, कपिल पाटील, प्रीतम मुंडे किंवा भागवत कराड, पूनम महाजन, हिना गावित यांची नावे चर्चेत भागवत कराड हे मराठवाड्यातील बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यांना गेल्या वर्षी राज्यसभेवर घेण्यात आले होते. दिल्लीला जाण्यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात पूजा केली.

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल(Narendra Modi Cabinet Expansion) होणार असून बुधवारी संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज होणारा फेरबदल हा भारताच्या राजकीय इतिहासात सर्वात तरूण मंत्रिमंडळ असेल. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांच्या सरासरी वयापेक्षा सर्वात कमी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार युवांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यात पीएचडी, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएट आणि प्रोफेशनल यांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलात प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक भागांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. १२ ओबीसी प्रतिनिधित्व असेल. छोट्या समुदायांनाही या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. महिलांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल. प्रशासकीय अनुभव असणाऱ्या व्यक्तींचंही मंत्रिमंडळात विशेष स्थान असणार आहे. मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील अनेक नेते दिल्लीत पोहचले आहेत. यात ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरूण गांधींचा समावेश आहे.

दिल्लीला जाण्यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात पूजा केली. मागील वर्षी काँग्रेस सोडून शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपा प्रवेशामुळे मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार कोसळलं आणि भाजपा पुन्हा सत्तेत आली. आसाममध्ये माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल निवडणुकीनंतर हेमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार झाले. त्यांचाही कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना कर्नाटकचं राज्यपाल बनवण्यात आलं. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची जागा रिक्त झाली आहे. राज्यसभेत त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२४ पर्यंत होता. त्यामुळे मंत्रिमंडळात अशा चेहऱ्याचाही समावेश होऊ शकतो जो संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नाही.  

महाराष्ट्रातून कोणाची वर्णी?

राज्यातून नारायण राणे, कपिल पाटील, प्रीतम मुंडे किंवा भागवत कराड, पूनम महाजन, हिना गावित यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी हिना गावित यांना अद्याप दिल्लीवरून फोन आलेला नाही. तर भागवत कराड यांना आज फोन आला आहे. भागवत कराड हे मराठवाड्यातील बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यांना गेल्या वर्षी राज्यसभेवर घेण्यात आले होते. पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर बंजारा समाजाचे नेते म्हणून भागवत कराड यांचे नाव पुढे करण्यात आले होते. राज्यात सध्या मराठा आंदोलनाचा विषय तापलेला आहे. यामुळे नारायण राणे(Narayan Rane) आणि बंजारा समाजाचे नेते भागवत कराड (Bhagvat karad)  यांच्या पारड्यात मंत्रिपद देवून जातीची समीकरणे बांधली जाण्याची शक्यता आहे. भागवत कराड यांना बोलावणे आल्याने प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारCentral Governmentकेंद्र सरकारNarayan Raneनारायण राणे Politicsराजकारण