शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

...तर नारायण राणेंना पुन्हा अटक होणार; अडचणी संपता संपेनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 8:23 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी अडचणी कायम

नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना काल अटक झाली. रात्री त्यांना जामीनदेखील मिळाला. नारायण राणेंच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यापासूनच राज्यातलं राजकारण तापलं. राणेंना जामीन मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र राणेंच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. महाडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. आता त्यांना पुढील महिन्यात नाशिक पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे. नाशिकमध्येच राणेंविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी राणेंच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

नाशिक पोलीस ठाण्यात नारायण राणेंना २ सप्टेंबरला हजर राहावं लागणार आहे. तशी नोटीस तपास अधिकारी आनंद वाघ यांनी बजावली आहे. या नोटिशीत कलम ५००, ५०५ सह इतर कलमांचा उल्लेख आहे. अशाच प्रकारची कलमं राणेंविरोधात महाड पोलीस ठाण्यातही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे नारायण राणेंना नाशिक सायबर पोलीस स्थानकात हजर राहावं लागेल. अन्यथा त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यांना अटकदेखील होऊ शकते. नाशिकप्रमाणेच गुन्हे दाखल झालेल्या अन्य पोलीस ठाण्यांतही राणेंना हजर राहावं लागू शकतं.

नारायण राणेंची उच्च न्यायालयात याचिकानारायण राणेंविरोधात महाड, नाशिकसह पुणे, ठाणे, मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत. या ठिकाणीदेखील राणेंना हजेरी लावण्याची गरज भासू शकते. या प्रकरणी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यात आले असून अटकदेखील बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. या प्रकरणी न्यायालय काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेBJPभाजपाShiv Senaशिवसेना