शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कल्याणमध्ये आगरी कार्डाभोवती राष्ट्रवादी-शिवसेनेचा पिंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:00 IST

शिवसेनेचा विकासावर भर; आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

- प्रशांत मानेशिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यातील थेट लढत यंदा कधी नव्हे एवढी आगरी मतांवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या महापालिका, नगरपालिका, ग्रामीण राजकारणात, तसेच प्रकल्पांवेळी झालेल्या अन्यायात शिवसेनेने या समाजाला डावलल्याची भावना त्या समाजात तीव्र आहे. या समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याची चित्रफीतही या काळात व्हायरल होते आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरील लढाईत या समाजाने काय कमावले, हा प्रश्नही प्रचारात तीव्र बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आमचं ठरलंय’ असा मेसेज व्हायरल होतोय आणि त्यामुळे ‘त्यांचं काय ठरलंय’ याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिवसेना-राष्ट्रवादीकडून सुरू आहे. रिंगणात जरी श्रीकांत शिंदे व बाबाजी पाटील असले, तरी मुलामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वत: न लढता काम करू असा शब्द दिल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.आगरी, मराठा-कुणबी व अन्य बहुभाषिकांसह मुस्लिम, दलित, सिंधी व उत्तर भारतीयांची मते येथे निर्णायक असली, तरी भूमिपुत्र विरुद्ध उच्चशिक्षित, विकास विरुद्ध जात हेच मुद्दे प्रामुख्याने प्रचारात आहेत. श्रीकांत शिंदे मागच्या वेळी राजकारणात नवे होते. गेल्या पाच वर्षांत तेही राजकारणातील बारकावे शिकले आहेत. उल्हासनगर, डोंबिवली पश्चिम, मलंगगड, दिवा, कल्याण ग्रामीण येथील सेनेच्या रॅलीत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. शक्तिप्रदर्शन केले. एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे संबंध उल्हासनगरच्या प्रचारावेळी ताणले गेले होते. मात्र, आता ते सुधारल्याने दोन्ही पक्ष प्रचारात उतरले आहेत.राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते गणेश नाईक स्वत: उतरले आहेत. मेळाव्यांबरोबर वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांचा भर आहे. नाईक यांनी बाबाजींना सोबत घेत, डोंबिवलीत सेना-भाजपच्या आगरी नगरसेवकांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. नेवाळीत विमानतळाच्या जागेवरून झालेला हिंसाचार आणि तेथे भूमिपुत्रांवर झालेला अन्याय, तेथील आक्रोश चर्चेत आहे. पालिकेतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा न सुटल्याने सर्वपक्षीय संघर्ष समितीने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीला मनसेची साथ असली, तरी पाठिंबा देण्यावरून त्या पक्षात दोन गट पडल्याचे चित्र आहे.वाहतूककोंडी, रेल्वेच्या समस्या, रुग्णालय सुविधांचा बोजवारा आदी प्रश्न कायम आहेत. प्रचारात आमचा भर वैयक्तिक भेटीगाठींवर आहे. रॅली काढून वाहतूककोंडी करून नागरिकांना आम्ही त्रास देत नाही. स्थानिक, आगरी समाजाचा असलो, तरी आमच्याकडून जातीचा प्रचार केला जात नाही.- बाबाजी पाटील, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस.रॅली व घरोघरीच्या प्रचाराला चांगली साथ लाभत आहे. मतदार सुशिक्षित असून, आगरी समाज हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आहे. आताही त्यांची साथ लाभेल, यात शंका नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन काम करत आहोत. समाजाचा विकास शिवसेनाच करू शकते, असा विश्वास मतदारांना आहे..- डॉ. श्रीकांत शिंदे, उमेदवार शिवसेनाकळीचे मुद्दे२७ गावे वगळण्याच्या मुद्द्यासह नेवाळी आंदोलनातील भूमिपुत्रांवरील अन्याय, सत्तेत सेनेकडून डावलला गेलेलाआगरी समाज.रेल्वे प्रवाशांचे प्रश्न, कळवा-ऐरोली लिंकमार्ग, ठाकुर्ली टर्मिनस, पाचवी-सहावी मार्गिका, कल्याण यार्डाच्या रिमॉडेलिंग प्रकल्पांची रखडगाथा.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस