शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे हायवेची विक्री कोणी केली, याचा आधी जबाब द्या”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 23:30 IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, तुम्हाला मुद्रीकरण म्हणजे का हे माहिती आहे का, असा खोचक सवाल केला.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, तुम्हाला मुद्रीकरण म्हणजे का हे माहिती आहे का, असा खोचक सवाल केला. (nirmala sitaraman replied rahul gandhi over criticism on national monetization pipeline)

मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार

नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन उपक्रमावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 वर्षात जनतेच्या पैशाने बनवलेली देशाची संपत्ती त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना विकत आहेत, असा आरोप केला होता. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, त्यांना मोनेटायझेशन म्हणजे काय, याची माहिती आहे का, असा बोचरा सवाल केला आहे. सीतारमण यांनी सार्वजनिक बँकाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का”; भाजपची टीका

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची विक्री कोणी केली

मुंबई-पुणे महामार्ग कोणी विकला, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची विक्री कोणी केली याचे आधी उत्तर द्या, असे सांगत मुंबई-पुणे हायवेची खासगी क्षेत्राला जवळपास ८००० कोटींना विक्री कोणत्या सरकारने केली. २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचे खासगीकरण झाले. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या विक्रीचा प्रस्ताव कोणत्या सरकारने मागवले होते. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आता भावोजीची मालकी आहे ना, असा थेट प्रश्न करत सीतारमण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! रोजगाराला चालना मिळणार; १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी

सामन्यांची दिशाभूल करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

मागील ७० वर्षात देशात जे उभे राहिले, त्याचे कॉमनवेल्थ खेळांच्या वेळी काय झाले. संपत्ती निर्माण करताना तयार झालेली मलाई कोणी खाल्ली. कॉंग्रेसने सत्तेच्या काळात रस्ते, रेल्वे, बंदरे, खाणी यांची विक्री केली आणि पैसा बनवला. याचा आधी त्यांनी जबाब द्यावा आणि मग मोदी सरकारवर टीका करावी, असा घणाघात सीतारामन यांनी केला. सामन्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याला जनता भुलणार नाही. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी अभ्यास करावा, असा सल्लाही सीतारामन यांनी यावेळी बोलताना दिला. 

टॅग्स :Politicsराजकारणnirmala sitharamanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसBJPभाजपा