शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप, भाजपाला जोरदार धक्का?; JDU आमदाराचा खळबळजनक दावा

By प्रविण मरगळे | Updated: January 8, 2021 10:34 IST

Bihar Political Update News: मागील काही दिवसांपासून भाजपाचे उमेदवार रोहित पांडेय यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देबिहारमधील जेडीयू आमदार गोपाल मंडल यांच्या विधानामुळे सध्या बिहारमधील राजकीय वातावरण पेटलं६ महिन्यानंतर मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार पायउतार होतील?जर तो आमच्यासोबत असता तर मंडल समाजाचे ३५ हजार मतं मिळून जिंकला असता

पटणा – अलीकडेच बिहारच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, यात भाजपा आणि नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षानं काठावरचं बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली, या निवडणुकीत भाजपाने ७४ जागा जिंकल्या तर जेडीयूला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावं लागलं. जास्त जागा जिंकूनही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं. मात्र सत्तेची चावी स्वत:कडे ठेवली. मात्र आता बिहारच्या राजकारणात पुन्हा एक मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारमधील जेडीयू आमदार गोपाल मंडल यांच्या विधानामुळे सध्या बिहारमधील राजकीय वातावरण पेटलं आहे. मंडळ यांच्या विधानामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचं बोललं जातं आहे. बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या NDA मध्ये सध्या धुसफूस वाढली आहे. यातच ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार पायउतार होतील आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव राज्यात सत्ता स्थापन करतील असा दावा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपाचे उमेदवार रोहित पांडेय यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे थंड असलेले राजकीय वातावरण पेटलं आहे. या क्लीपच्या व्हायरल झाल्यानंतर आमदार गोपाल मंडल यांची बदनामी झाली. यामुळे त्यांनी मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडली. माध्यमासमोर बोलताना गोपाल मंडल म्हणाले की, नितीश कुमार हे दबंग मुख्यमंत्री आहेत. ते ६ महिन्यानंतर पायउतार होतील, त्यानंतर राज्यात तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतील असा दावा त्यांनी केला.

गोपाल मंडल यांनी स्वत:लाही दबंग आमदार असल्याचा दावा केला. आम्ही आदेश काढून कोणालाही जिंकवू शकतो, रोहित माझा छोटा भाऊ आहे, जर तो आमच्यासोबत असता तर मंडल समाजाचे ३५ हजार मतं मिळून जिंकला असता. मी १४ निवडणूक पाहून सांगू शकतो कोण जिंकणार आणि कोण हरणार आहे. इतकचं नाही तर ऑडिओ क्लीप व्हायरल होण्याचं खापर गोपाल मंडल यांनी भाजपाचे आमदार शैलेंद्र यांच्यावर फोडलं.

काँग्रेसचे आमदार फुटण्याचा माजी आमदाराचा दावा

बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी ११ आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते व माजी आमदार भरतसिंह यांनी केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ पाहणारे आमदार हे मुळात याआधी दुसऱ्या पक्षांतून काँग्रेसमध्ये आले होते. या लोकांनी भरपूर पैसे देऊन विधानसभा निवडणुकांत उमेदवारीची तिकिटे विकत घेतली व ते आमदार झाले. बिहारमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेशप्रसाद सिंह, काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा, ज्येष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हेदेखील पक्षत्याग करू शकतात. या नेत्यांनी नेहमीच पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, असा आरोप भरतसिंह यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसने युती करण्यास माझा ठाम विरोध होता. या युतीमुळे काँग्रेसने स्वत:चे खूप मोठे नुकसान करून घेतले.

२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२३ आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ तर आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीला ११० जागा मिळाल्या होत्या. एनडीएमध्ये भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ आणि इतर पक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या आकड्यात किंचीत बदल झाला तरी नितीश कुमार सरकार अडचणीत येऊ शकते.

 

टॅग्स :BJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार