शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'मजबूर नव्हे तर मजबूत सरकार पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 01:11 IST

देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वाडा : भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे आयोजित केलेल्या महामेळाव्यात देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महायुतीच्या वाडा येथे झालेल्या पहिल्याच मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने व्यासपीठावर उपस्थित नेत्यांच्या चेह-यावर नाराजीचा भाव दिसत होताभाजप, शिवसेना, रिपाई, श्रमजीवी संघटना व कुणबी सेना यांच्यावतीने भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याची वेळ प्रत्यक्ष सकाळी अकरा वाजता असताना दुपारी चार वाजता सुरू झाला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला.यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी भाजप शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवत आहे तर विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. वाडा एमएमआरडीए क्षेत्रात येत नसल्याने विकास खुंटला आहे. यापुढे वाडा एमएमआरडीए क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे शिंदे यांनी स्पष्ट केले.खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, वाडाचा विकास करण्याचा वादा केला. मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या चांगल्या कामामुळे या निवडणुकीत भ्रष्टाचार व महागाईचा मुद्दा नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार असून मी खासदार झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता खासदार असेल या भावनेने काम करेल असे सांगितले. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीच्या दुष्काळामुळे आयोजक आणि नेते एकमेकाचे तोंड चुकवत होते.>अल्प प्रतिसाद, एकनाथराव विसरले कपिल पाटलांची निशाणी : मेळाव्यामध्ये निम्याहुन अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याने मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. या मेळाव्यात गर्दी दिसावी म्हणून अल्पवयीन मुलांना सहभागी केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना कपिल पाटील यांच्या धनुष्यबान या निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी धनुष्यबाण, धनुष्यबाण असा तीन वेळा निशाणीचा नामोउल्लेख केल्यानंतर उमेदवार कपिल पाटील यांनी कमळ निशाणी असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर शिंदे यांची चूक लक्षात आली.>नगरसेवकांचा बहिष्कार : या मेळाव्याला वाडा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता.>शिवसेनेच्या वाघांनी मारला रामनवमीला चिकन बिर्याणीवर ताव : वाडा येथे महायुतीच्या मेळावा शनिवारी रामनवमी या दिवशी आयोजित केला होता. या महामेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यासाठी भोजनासाठी चिकन बिर्याणी ची व्यवस्था केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये रामाच्या नावाने मते मागणारे रामनवमीच्या दिवशी चिकन बिर्याणीवर ताव मारत होते. अशी खंत प्रामाणिक कार्यकर्ते व्यक्त करीत होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी