शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

UP Election 2022: “उत्तर प्रदेश निवडणुकीत BJP ला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 2:40 PM

UP Election 2022: भाजपवाले भ्रमात असून, या निवडणुकीनंतर अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील, असा दावा करण्यात आला आहे.

लखनऊ: देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये (UP Election 2022) सर्व पक्षांनी कसून तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजप आणि योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीत भाजपला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले, या शब्दांत राजभर यांनी हल्लाबोल केला आहे. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ओमप्रकाश राजभर यांची मनधरणी करण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेत्यांनी महिन्यातून तीनवेळा ओमप्रकाश राजभर यांची भेट घेतल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ओमप्रकाश राजभर यांनी यंदाची निवडणूक अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत लढणार असल्याचे म्हटले आहे. पूर्वांचल भागात ओमप्रकाश राजभर यांचा मोठा प्रभाव असून, भाजपची या भागातून पिछेहाट होताना दिसत असल्याचे म्हटले जात आहे. म्हणूनच भाजप आता ओमप्रकाश राजभर यांना आपल्याबाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. 

BJP ला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले. पूर्वांचल येथील बलिया, मऊ, आझमगड आणि मिर्झापूर यांसारख्या भागात भाजपचा सुफडा साफ होणार आहे. या ठिकाणी भाजपला खातेही उघडता येणार नाही. शेतकरी शेतात दंडुके घेऊन उभे आहेत, असा दावाही राजभर यांनी यावेळी केला आहे. 

अखिलेश यादव मुख्यमंत्री होणार

भाजपला जनतेचा कौल मिळणार नाही. अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील. भाजपवाले भ्रमात आहेत. हिंदू-हिंदू करणारे नकली हिंदू आहेत. व्यापारीही भाजपवाल्यांना कंटाळले आहेत, असेही राजभर यांनी सांगितले. तसेच मंत्री बनणार का, यावर बोलताना राजभर यांनी स्पष्ट केले की, आम्ही सपासोबत जात आहोत. जेवढ्या मोर्चाचे नेते यात सहभाग होत आहेत, त्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. मीही मंत्री होईन, असे राजभर यांनी नमूद केले.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी