शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'सर्व जाती-धर्मातील लोकांना घेऊन जनसेवा करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:41 IST

सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली.

म्हसळा : भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात सांगितलेल्या भगवद्गीतेप्रमाणे आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. हाच आदर्श मानून सर्व जाती-धर्मातील लोकांना, समाज घटकांना सोबत घेऊनच अविरतपणे जनसेवा करीत राहणार आहे. आगामी काळात पाच वर्षे आघाडीचाच खासदार म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले आहे.म्हसळा येथील आयोजित आघाडीच्या प्रचारसभेत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे बोलत होते. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गाववाडी-वस्तीवर आघाडी सरकारच्या काळात आमदार, राज्यमंत्री, जलसंपदामंत्री व दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम करताना सहकारी मंत्र्यांना सोबत घेऊन शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रु पयांची विकासकामे केली आहेत याचा आनंद व अभिमान आहे, असे सांगून आतासुद्धा केंद्रात व राज्यात सत्ता नसतानादेखील विद्यमान युती सरकारमधील मंत्र्यांकडून कोट्यवधी रु पयांचा विकासनिधी मतदारसंघात उपलब्ध करून देण्यास यशस्वी झालो आहे, असे सांगून जिल्ह्यातील जनतेचे आणि माझे नाते अतूट आहे, असा विश्वास व्यक्त केला.तसेच माझे राजकारण किंवा समाजकारण फक्त एका समाजापुरते मर्यादित नसून आगरी, कोळी, कुणबी, मराठा, धनगर, आदिवासी अशा विविध जाती-जमातीच्या व बौद्ध, मुस्लीम अशा सर्व धर्मीयांच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणारे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व समाज घटकातील लोकांना सरपंच, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक अशा विविध पदांवर लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देता आली, याचे समाधान आहे. समाजाच्या नावावर मते मागणाऱ्या अनंत गीते यांनी समाजासाठी काय केले आहे, याचेही उत्तर दिले पाहिजे. त्याचबरोबर विकासकामे करता आली नाहीत त्यामुळे आता माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याचा एकमेव मार्ग अवलंबिलेल्या गीतेंनी टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे, असे जाहीर आवाहन अनंत गीतेंना करून जे गीते स्वत:ला स्वत: मतदान करू शकत नाहीत ते जनतेचा काय विकास करणार, असा रोखठोक सवाल गीतेंना केला आहे.काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार माणिक जगताप यांनी आपल्या भाषणाच्या सुरु वातीपासून अनंत गीतेंवर आगपाखड के ली. फक्त भावनिक राजकारण करून गीतेंनी इतके वर्षे खासदारकी उपभोगली; परंतु त्यांनी मतदारसंघात कोणताही ठोस विकास केला नसल्याची टीका केली. या वेळी आमदार पंडित पाटील, आ.अनिकेत तटकरे, काँगेस महिला जिल्हा अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, ज्येष्ठ नेते अली कौचाली, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड