शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपा नेता भावूक, फेसबुक पोस्टमधून दिली भावनांना मोकळी वाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 17:09 IST

PM Modi Cabinet Expansion: भाजपाचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आमदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही राजीनामा घेण्यात आला असून, मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर भावूक झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

ठळक मुद्देमला मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. मी राजीनामा दिलामला मंत्रिमंडळात सहभागी करून देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतोमंत्रिपदाच्या कार्यकाळात माझ्यावर कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाहीत याचा मला आनंद

नवी दिल्ली - पुढच्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये काही मंत्र्यांचा खांदेपालट होणार आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक मंत्र्यांचा राजीनामाही घेण्यात आला आहे. त्यामुळे काही नेत्यांना धक्का बसला आहे. भाजपाचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आमदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही राजीनामा घेण्यात आला असून, मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर भावूक झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत मंत्रिपदावर संधी दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले आहेत. (Babul Supriyo expresses grief over resignation of minister)

मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा आज संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. यामध्ये एकूण ४३ मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर आपल्या फेसबुक पोस्टममध्ये बाबूल सुप्रियो म्हणाले की, हो, मला मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. मी राजीनामा दिला आहे. मला मंत्रिमंडळात सहभागी करून देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.

मंत्रिपदाच्या कार्यकाळात माझ्यावर कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाहीत याचा मला आनंद आहे. मी माझा मतदारसंघ असलेल्या आसनसोलच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे तेथील जनतेने २०१९ मध्ये मला तीन पट अधिक मताधिक्याने विजयी केले, असे बाबूल सुप्रियो त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले.
बंगालमधून खासदास असलेल्या बाबूल सुप्रियो यांनी मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर दु:ख व्यक्त करताना लिहिले की, बंगालमधून ज्या लोकांना मंत्री बनवण्यात येऊ शकते, त्यांचे मी आता नाव घेऊ शकत नाही. मात्र मी त्यांना शुभेच्छा देतो. मी माझ्यासाठी निश्चितपणे दु:खी आहे. मात्र ज्यांना मंत्री बनणवण्यात आले आहे, त्यांच्यासाठी मी आनंदी आहे.  

टॅग्स :Babul Supriyoबाबुल सुप्रियोBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण