शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Karnataka Politics: कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय संकट; मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात

By प्रविण मरगळे | Updated: October 20, 2020 13:41 IST

CM BS Yediyurappa News: येडियुरप्पाऐवजी आता उत्तर कर्नाटकातील कुणालाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी विधानसभेतील आमदार यतनाल यांनी केली आहे

ठळक मुद्देसहा महिन्यापूर्वीही येडियुरप्पा यांच्याविरोधात २० आमदारांनी मोर्चा उघडला होताराज्यातील बहुतांश नेते मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर समाधानी नाही असा दावा येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री बनले असून उत्तर कर्नाटकातील १०० आमदारांनी त्यांना ते पद दिलं आहे

बंगळुरु - कर्नाटकमधील भाजपाचे आमदार बसनगौडा पी यतनाल यांनी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करत राज्यात मुख्यमंत्री बदलासाठी आघाडी उघडली आहे. राज्यातील विजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार यतनाल यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश नेते मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर समाधानी नाही असा दावा त्यांनी केला आहे.

येडियुरप्पाऐवजी आता उत्तर कर्नाटकातील कुणालाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी विधानसभेतील आमदार यतनाल यांनी केली आहे. यतनाल म्हणाले, राज्याचे बहुतेक वरिष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर खूश नसल्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलले जातील, पुढचे मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकचे असतील असं पीएम मोदींनीही म्हटलं आहे. येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री बनले असून उत्तर कर्नाटकातील १०० आमदारांनी त्यांना ते पद दिलं आहे असा दावा त्यांनी केला.

 

येडियुरप्पा यांच्या कामावर उत्तर कर्नाटकचे आमदार संतप्त

कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर डी कुमारस्वामी यांचे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्याने तयार झाले. पण नंतर सरकारमध्ये सहभागी झालेल्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत पक्षांतर केल्यानं कुमारस्वामी सरकार कोसळलं, राज्यात भाजपाचं सरकार आलं. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री केले गेले होते, परंतु भाजपाचा एक मोठा गट  येडियुरप्पा यांच्यावर बऱ्याच काळापासून नाराज आहे असं बोललं जातं.

सहा महिन्यापूर्वीही येडियुरप्पा यांच्याविरोधात २० आमदारांनी मोर्चा उघडला होता. नाराज असलेल्या आमदारांनी उमेश कत्ती यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याची मागणी केली होती. कत्ती हे आठवेळा आमदार राहिलेले आहेत. याशिवाय उमेश कत्ती यांचे भाऊ रमेश कत्ती यांना राज्यसभेवर पाठविण्याच यावे अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केली होती. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जरी राज्यसभेचे वृत्त फेटाळले असले तरीही उमेश कत्ती यांनी भेटीचे कारण जगजाहीर केले आहे. येडीयुराप्पांनी  माझ्या भावाला राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. याचीच आठवण करून देण्यासाठी रमेश कत्ती येडियुराप्पांना भेटण्यासाठी गेले होते, असे उमेश कत्ती म्हणाले होते.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पा