शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

शिवसंपर्क अभियानातील कार्यकर्ता म्हणाला, “भाऊ किती दिवस एवढे बंधनात राहायचे, खूप झाले ना....”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:40 IST

या निमित्ताने पदाधिकारी गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्यांची निवेदनही स्वीकारत आहेत

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं लोक पुन्हा बिनधास्तपणे वागायला लागले आहेत. तब्बल दीड वर्षापासून मास्क, फिजिकल डिस्टन्स वैगेरे नियम पाळल्यानंतर हे नियम आता लोकांच्या अंगवळणी पडले आहेत असे वाटत होते. फोनच्या कॉलर ट्यूनमधील बाई कोरोना अभी गया नही, तीन बाते याद रखे असे म्हणून किती कॅसेट घासत राहिली तरी लोक आता ऐकायला तयार नाहीत. ग्रामीण भागात तर लोकांनी मास्क केव्हाच काढून फेकले आहेत. गेल्या आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान जोमाने सुरू आहे.

या निमित्ताने पदाधिकारी गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्यांची निवेदनही स्वीकारत आहेत. पण हे करताना सामाजिक अंतर सोडा, तोंडावर मास्कही लावण्याचं भान कुणाला राहत नाही. एका सज्जनाने सहज याबद्दल प्रश्न केला. त्यावर एक कार्यकर्ता म्हणाला, भाऊ किती दिवस एवढे बंधनात राहायचे, खूप झाले ना..गेला कोरोना आता....

संकटकाळातदेखील विरोधकांना चिमटे

कोकणात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. एरवी सोशल माध्यमांवर सक्रीय असणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या कालावधीत सातत्याने जनतेच्या प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून संपर्कात राहणे अपेक्षित होते. मात्र ती दिवसांत त्यांनी या घटनेसंदर्भात शोक व्यक्त करणारे तीन आणि टोल फ्री क्रमांकाची माहिती देणारे एक असे एकूण चारच ट्विट केले आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे संघ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विरोधकांवर टीका करणाऱ्या त्यांच्या ट्विटची संख्या जास्त आहे. संकटकाळात राज्यातील मंत्र्याने सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. मात्र पक्षातीलच अंतर्गत गटबाजी व विरोधकांवर टीका करण्यात ते व्यस्त असल्याने सोशल माध्यमांवर त्याचेच प्रतिबिंब उमटत आहे. मंत्र्याने पुढाकार घेतला तर अधिकारी कामाला लागतात असे म्हटले जाते. मात्र संकटकाळात जनतेच्या समस्या दूर करण्यापेक्षा विरोधकांना चिमटे काढण्यावरच नेत्यांचा भर असेल तर अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार?

(ही कुजबुज योगेश पांडे, अंकुश गुंडावार, मनोज ताजने, ज्ञानेश्वर मुंदे, सुरेंद्र राऊत यांनी लिहिली आहे)

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNitin Rautनितीन राऊत