शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

प्रणव मुखर्जींचे चिरंजीव अडचणीत, जांगीरपूरमध्ये यशाचा मार्ग कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:24 IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांच्यासाठी यशाचा मार्ग खूपच कठीण आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भाजपने पश्चिम बंगालमध्ये जांगीरपूर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि माकपच्या मतांना फाटे फोडण्यासाठी मुस्लिम महिलेला उमेदवारी दिली असली तरी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांच्यासाठी यशाचा मार्ग खूपच कठीण आहे.जांगीरपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. कधी तेथून प्रणव मुखर्जी, तर कधी त्यांचा मुलगा जिंकला. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात कट्टर वैर असतानाही मुखर्जी यांना अनेक दशके त्रास झाला नाही. आता मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील ४२ मतदारसंघांमागे आपली शक्ती लावण्याचे ठरवल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. २०१४ च्या निवडणुकीत अभिजित मुखर्जींनी चौरंगी लढतीत फक्त ८ हजार मतांनी विजय मिळवला होता. तेव्हा भाजप राज्यात अजिबात महत्त्वाचा नव्हता, तरीही त्याचे उमेदवार सम्राट घोष यांना ११ लाखांपैकी जवळपास एक लाख मते मिळाली. या मतदारसंघात मतदारांची संख्या खूपच वाढून ती १६ लाखांपेक्षा जास्त झाली आहे व त्यातील ७० टक्के मुस्लिम आहेत. येथे २३ एप्रिल रोजी मतदान होईल.मुखर्जी यांनी मोदी सरकारशी चांगले संबंध निर्माण केले. मोदी सरकारने मुखर्जी यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला व मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यानंतर भाजपने माकपमधून आलेल्या मुस्लिम महिलेला जांगीरपूरमध्ये उमेदवारी दिली. राज्यात माकपची घसरण वेगाने झाली. त्याचे कार्यकर्ते एक तर भाजपमध्ये किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. माकपने तुलनेने नवा चेहरा झुल्फीकार अली यांना, तर तृणमूल काँग्रेसने खलीऊल रेहमान यांना उमेदवारी दिली आहे.भाजपने मुस्लिम मते विभागली जावीत यासाठी मफुजा खातूम यांना उमेदवारी दिली आहे. भाजप सर्व ४२ जागा लढवत आहे. अभिजित मुखर्जी यांना मदत व्हावी यासाठी भाजपने मुस्लिम महिलेला उभे केले. दुसरा एकच मुस्लिम उमेदवार भाजपने दिला, ते तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री हुमायून कबीर. हे दोन अपवाद वगळता देशात भाजपने ४६०पैकी एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही.>काय आहेत अडचणी?काळजीत पडलेल्या प्रणव मुखर्जी यांनी आता स्वत: लक्ष घातले आहे. ममता बॅनर्जी यांनी अभिजित मुखर्जी यांना मदत न करण्याची ठाम भूमिका घेतली. काँग्रेसला माकपबरोबर निवडणूक युती करण्यात अपयश आल्यामुळे यावेळी अभिजित मुखर्जी यांचे भवितव्य संकटात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019jangipur-pcजंगीपूर