शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल्लांना हवा जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान, मोदी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 22:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि महागठबंधनवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि महागठबंधनवर हल्लाबोल केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची केलेली मागणीवरूनच आता मोदींनी विरोधकांना कात्रीत पकडलं आहे. मोदी एका रॅलीला संबोधित करताना म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान व्हावा, यांसारखी स्थिती निर्माण केली जातेय. अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या नेत्यांना काँग्रेस आणि महागठबंधनवाले समर्थन देणार आहेत काय, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला आहे.भाजपाच्या काही नेत्यांनी जम्मू-काश्मीरमधला 370 कलम संपवण्याच्या केलेल्या मागणीवर ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असावा, अशी मागणी केली होती. तसेच जम्मू-काश्मीरच्या संरक्षणासाठी वेगळा पंतप्रधान त्या राज्याला मिळायलाच हवा, याचाही उल्लेख ओमर अब्दुल्लांनी केला.मोदींनी या प्रचार सभेत आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंवरही निशाणा साधला आहे. मोदींनी चंद्राबाबूंची तुलना प्रसिद्ध चित्रपट असलेल्या बाहुबलीतल्या भल्लालदेवशी केली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थिती सत्ता स्वतःच्याच घरात ठेवायची आहे, अशी टीकाही मोदींनी केली आहे. चंद्राबाबू नायडू हे बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवसारखंच आहेत. तसेच त्यांनी अनेक लोकांची माहिती चोरल्याचा आरोपही मोदींनी केला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTelangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019