शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Rahul Gandhi: राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 04:33 IST

CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : काँग्रेसने केली भाजप नेतृत्वावर टीका 

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व निवडणूक रॅली रद्द केल्या आहेत. मोठ्या सभा घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी अन्य नेत्यांना केले आहे. 

राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी प. बंगालमधील माझ्या सर्व सभा स्थगित करत आहे. मी सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की, सध्याच्या परिस्थितीत मोठ्या सभा, रॅली आयोजित करण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करा. प. बंगालमधील भाजप नेत्यांच्या रॅलीतील गर्दीकडे संभाव्य इशारा करताना त्यांनी म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या संख्येने आजारी लोक आणि मृतांची संख्या प्रथमच दिसून येत आहे. 

देशात कोरोना रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे मोठ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. यावरून काँग्रेस सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आरोप केला आहे की, कोरोना साथीला तोंड देण्याऐवजी मोदी हे प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत प्रचार करून संवेदनशून्यता दाखवत आहेत. सभा रद्द केल्याबद्दल राहुल गांधी यांचे कौतुक करताना काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर गिल यांनी म्हटले आहे की, भाजपने अहंकार सोडून राहुल गांधी यांचे अनुसरण करायला हवे. 

राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचारसभा कमी करण्याचा भाजपचा विचारदेशात कोरोना विषाणूचा फैलाव भीती वाटावी, अशा वेगाने होत असताना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्या संकटाची अखेर जाणीव झाली आहे. जनता दलाने (संयुक्त) दिल्ली आणि पाटण्यातील आपली मुख्यालये बंद केली. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे राहिले असून त्यात भाजपच्या काही राष्ट्रीय नेत्यांच्या होणाऱ्या प्रचारसभा कमी करण्याचा विचार पक्षाचे नेतृत्व करीत आहे. मात्र, अजून निर्णय जाहीर झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संत आणि धार्मिक नेत्यांना कुंभमेळा प्रतीकात्मक करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून तीन प्रमुख आखाड्यांनी कुंभमेळा प्रतीकात्मक केल्याचे जाहीर केले. 

इतर आखाड्यांनी हा निर्णय अजून मान्य केलेला नाही. तथापि, मोदी शनिवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे मोठ्या प्रचारसभेला गेले होते. काँग्रेसमधील सूत्रांनी म्हटले की, प्रियांका गांधी यादेखील आता पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार नाहीत. त्या आठवडाभर विलगीकरणात होत्या. बिहारमध्ये कोविडचा फैलाव खूप वेगात होत असल्यामुळे सत्ताधारी जनता दलाने पाटणा आणि दिल्लीतील आपली मुख्यालये बंद केली आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्या