शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

गलती से मिस्टेक! राहुल गांधींचा गरिबीऐवजी गरिबांवर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:47 IST

न्याय योजनेची घोषणा करताना राहुल गांधींची चूक

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं जाहीरनामा जाहीर केला. या जाहीरनाम्याला काँग्रेसनं 'जन आवाज' असं नाव दिलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनामा पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर 'हम निभाएंगे' असं लिहिण्यात आलं आहे. काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे या जाहीरनाम्यात न्याय योजनेचा उल्लेख केला. याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना राहुल गांधींकडून एक चूक झाली. गरिबीवर वार म्हणण्याऐवजी ते चुकून गरिबांवर वार असं म्हणाले. राहुल गांधींनी न्याय योजनेसह काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाच महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली. यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी न्याय योजनेवर भाष्य करताना राहुल गांधी गडबडले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 30 हजार कोटी रुपये उद्योगपतींना देऊ शकतात, तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकतो. आमची भूमिका स्पष्ट आहे. 72 हजार गरिबांवर वार, 72000,' असं राहुल म्हणाले. आपल्याला गरिबीवर वार करायचा आहे, असं राहुल गांधींना म्हणायचं होतं. मात्र चुकून ते गरिबांवर वार असं म्हणून गेले. विशेष म्हणजे राहुल गांधींना त्यांची चूक लक्षातच आली नाही. ते यानंतरही बोलतच होते. त्यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरंदेखील दिली. पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील प्रश्न विचारायला हवेत, असं राहुल यांनी म्हटलं. मोदी पत्रकार परिषद घेण्यास का घाबरतात, असा प्रश्न पत्रकारांनी मोदींना विचारायला हवा, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी न्याय योजनेसोबतच इतर चार मुद्द्यांवरही भाष्य केलं. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेल्या पंजाला पाच बोटं आहेत. त्याप्रमाणेच काँग्रेसच्या जाहीरमान्यातही पाच प्रमुख घोषणा असल्याचं यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं. न्याय योजनेसह रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी