शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राहुल गांधी पुन्हा होऊ शकतात काँग्रेसाध्यक्ष, पक्षाची जबाबदारी सांभाळण्यास तयार - सूत्रांची माहिती

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 5, 2021 14:47 IST

राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. यासंदर्भात शनिवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती.

ठळक मुद्दे राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे जवळपास 5 तासहून अधिक वेळ ही बैठक चालली. राहुल गांधी यांनी, 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला होता राजीनामा

नवी दिल्ली -काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असतानाच आता पुन्हा एकदा काँग्रेसाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. यासंदर्भात शनिवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या वेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारीही उपस्थित होते.5 तासहून अधिक वेळ चालली बौठक - सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे जवळपास 5 तासहून अधिक वेळ ही बैठक चालली. यावेळी उपस्थित सर्व नेते मंडळींनी आपापले विचार व्यक्त केले. तसेच या बैठकीत, राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसाध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी मागणीही करण्यात आली. यानंतर अखेर, पक्ष जी जबाबदारी देईल ती सांभाळण्यास आपण तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. 

या खासदारांनी केली मागणी -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत के. सुरेश, अब्दुल खालिक, गौरव गोगोई आणि काही इतर खासदारांनी, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची धुरा साभाळावी, असा आग्रह केला होता. या खासदारांशीवाय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, दिग्विजय सिंह देखील म्हणाले, की आता राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे नेतृत्व करायला हवे. नुकतेच, काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अशीच मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचे अनेक नेत्यांनी समर्थनही केले होते.

'सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला होता राजीनामा' -राहुल गांधी यांनी 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यानंतर, या पराभवाची जबाबदारी घेत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहूल गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्यात लिहिले होते, 'काँग्रेस अध्यक्ष म्हणून 2019मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत मिळालेल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे. आपल्या पक्षाच्या भविष्यासाठी उत्तरदायित्व आवश्यक आहे. यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.' 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीdelhiदिल्ली