शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?", राहुल यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:23 IST

देशाच्या सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन बैठकीत वेळ वाया गेला, असं विधान राहुल यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर केलं होतं.

ठळक मुद्देसंरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून काँग्रेसने केलं होतं 'वॉकआउट'बैठकीत बोलू न दिल्याचा राहुल यांचा आरोपराहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली तक्रार

नवी दिल्लीसंरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून 'वॉक आउट' केलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहिलं आहे. बैठकीत सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचं राहुल यांनी पत्रात नमूद केलं आहे. समितीतील प्रत्येक सदस्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार असायला हवा, असं राहुल यांनी म्हटलं आहे. 

"संरक्षण विषयक संसदीय समितीचा सदस्य असल्यानं एखाद्या विषयावरील चर्चेत मुद्दा उपस्थित करण्याचा मला अधिकार आहे. पण बैठकीत बोलूच न देणं हे लोकशाहीच्या विरोधात असून अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे", असं राहुल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

संरक्षण विषयक संसदीय समितीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी 'वॉक आउट' केले होते. बैठकीत समितीच्या अध्यक्षांनी राहुल यांना बोलूच दिलं नाही. त्यामुळे बैठकीतून निघून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी संतापले; बैठकीतून निघून गेले

देशाच्या सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन बैठकीत वेळ वाया गेला, असं विधान राहुल यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये तिन्ही सेना दलाचे प्रमुख बिपीन रावत सैन्याच्या गणवेशात बदल करण्याबाबतची माहिती देत होते. यावेळी राहुल यांनी हस्तक्षेप करत लडाखमध्ये काय परिस्थिती आहे? चीनविरोधात आपली काय रणनिती आहे? या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी असं म्हटलं. यावरुन बैठकीचे अध्यक्ष जुआल ओराम आणि राहुल यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर राहुल यांनी बैठकीतून निघून जाण्याचा मार्ग स्वीकारला.