शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

राहुल गांधी यांना कोर्टाची अवमानना नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 03:49 IST

फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीकडून राफेलची लढाऊ विमान खरेदीशी संबंधित एका प्रकरणाचा गेल्या आठवड्यात निकाल देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’, असे भाष्य आपण कधीही केलेले नव्हते,

नवी दिल्ली: फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीकडून राफेलची लढाऊ विमान खरेदीशी संबंधित एका प्रकरणाचा गेल्या आठवड्यात निकाल देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’, असे भाष्य आपण कधीही केलेले नव्हते, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने असे चुकीचे विधान आपल्या तोंडी घातल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी न्यायालयीन अवमानाची (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) नोटीस जारी केली आहे.मूळ राफेल विमान खरेदी प्रकरणात गेल्या जानेवारी महिन्यामध्ये दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी करण्यात आलेल्या याचिकांसाठी संरक्षण मंत्रालयाच्या फायलींमधून अनधिकृतपणे मिळविलेल्या दस्तावेजांचा वापर केलेला असल्याने पुरावे म्हणून त्यांचा विचार करू नये, हा केंद्र सरकारने घेतलेला प्राथमिक आक्षेप अमान्य करण्याचा निकाल सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने गेल्या गुरुवारी दिला होता.सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला, त्याच सुमारास राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी ‘अब सर्वोच्च न्यायालयने भी कहा है की चौकीदार चोर है’, असे विधान केले होते.सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्षात न केलेले वक्तव्य न्यायालायच्या तोंडी घालून आणि तसा जाहीर गैरसमज निर्माण करून गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याने त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी याचिका भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी लगेच अवमानना याचिका दाखल केली.मीनाक्षी लेखी यांची ही याचिका सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा न्यायालयाने राहुल गांधी यांनी केलेले विधान धादान्त असत्य असल्याचे स्पष्ट करून त्याचा खुलासा करण्यासाठी त्यांना नोटीस जारी केली.राहुल गांधी यांनी आपले उत्तर २२ एप्रिलपर्यंत न्यायालयाला द्यायचे आहे. त्यानंतर पुढील सुनावणी येत्या मंगळवारी २३ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.>‘न्यायालयाने तसे विधान केलेलेच नाही’खंडपीठाने नमूद केले की, राहुल गांधी यांनी या न्यायालयाने काही विधाने वा भाष्य केल्याची अथवा निष्कर्ष नोंदविल्याचे वक्तव्य माध्यमांमध्ये केले आहे, तशी विधाने किंवा भाष्ये न्यायालयाने कधीही केलेली नाहीत. पण तशी विधाने तयंनी न्यायालयाच्या तोंडी घालली आहेत. काही कागदपत्रे न्यायालयीन कामकाजात ग्राह्य धरण्याविषयी अ‍ॅटर्नी जनरलनी उपस्थित केलेल्या आक्षेपावर आम्ही निकाल देत होतो. त्यामुळे न्यायालयाने अशी कोणताही विधाने त्यावेळी करण्याचा मुळात प्रश्नच नव्हता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डील