शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

“...नाहीतर शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”; रामदास आठवलेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:55 AM

आता रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी एक भाकित वर्तवले आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघडीच्या सरकारमध्ये सातत्याने भांडण असतातनाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईलरिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे भाकित

अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांमुळे तापलेले पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती आणि निर्बंध, महागाई यांवरून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी एक भाकित वर्तवले असून, शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल, असे म्हटले आहे. (ramdas athawale predicts about shiv sena future and says sena should reunite with bjp)

शिवसेनेने भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन करावे, अजूनही वेळ गेली नाही, अशी इच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रामदास आठवले यांनी शिवसेनेचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार, यावर भाकित केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

“मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; मिलिंद नार्वेकरांना धमकी

शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारायचे असेल तर...

महाविकास आघडीच्या सरकारमध्ये सातत्याने भांडण असतात. त्यामुळे हे सरकार कीती वर्ष टीकेल हे काही सांगता येत नाही. यांना एकत्र राहायचं असेल तर यांनी एकमेकांमध्ये कोपरखळ्या मारण्याचं थांबवल पाहिजे. तसेच शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारायचे असेल आणि आपले मतदार जपायचे असतील तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, तेव्हाच शिवसेना टिकेल. नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल, असे भाकित रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले

दरम्यान, राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने वागले आहेत, असे दावा करत यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. राहुल गांधी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करतात. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे, असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा