शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Sachin Vaze Case: 'महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'; प्रकाश जावडेकर कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 16:36 IST

Prakash Javadekar: महाराष्ट्रात गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा रेकॉर्ड ठेवणंही कठीण काम आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे, जावडेकरांचा हल्लाबोल

"महाराष्ट्रात गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा रेकॉर्ड ठेवणंही कठीण काम आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहे. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरलेला नाहीय", असा हल्लाबोल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला आहे. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. (prakash javadekar says maharashtra government don't have right to stay in power)

जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. "सचिन वाझेचे कारनामे एनआयएच्या चौकशी आता उघड झाले आहेत. अशा व्यक्तीचं मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत समर्थन का केलं? वाझे काहीतरी खुलासे करेल म्हणूनच त्याला पाठिशी घातलं जात होतं. आता वाझे यानं लिहिलेल्या पत्रात अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. हे अतिशय गंभीर आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकारच उरलेला नाही", असा हल्लाबोल जावडेकर यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री गप्प का?"पोलीस बॉम्ब ठेवतात हे प्रकरण जगातलं एकमेव प्रकरण असावं. मंत्र्यांनी पोलिसांना वसुली करायला लावणं हे अतिशय गंभीर असून पोलिसांना वसुली करायला लावणं हाच राज्य सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. रोज या प्रकरणात इतकं काय काय समोर येतंय की याचा रेकॉर्ड ठेवणंही कठीण झालं आहे", असं सांगत जावडेकर यांनी संपूर्ण प्रकरणांचा पाठाच वाचून दाखवला. 

सचिन वाझे प्रकरणात इतकं काही घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री अद्याप गप्प का आहेत? त्यांनी सुरुवातीला वाझेचं समर्थन कशासाठी केलं होतं? शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावंच लागेल, असंही जावडेकर म्हणाले. 

जनतेच्या मनातलं सरकार नाहीमहाविकास आघाडी सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. हे सरकार फक्त वसुली सरकार आहे. जनतेनं भाजपा आणि शिवसेना युतीला मतदान करुन कौल दिला होता. पण शिवसेनेनं गद्दारी करुन विरोधी पक्षाला हात मिळवला आणि जनतेनं दिलेल्या मतदानाचा अपमान केला, अशी टीका जावडेकर यांनी यावेळी केली.  

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरsachin Vazeसचिन वाझेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख