शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबाद की संभाजीनगर? नामांतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमाेर येणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:52 IST

Aurangabad Rename : शिवसेनेची खेळी; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

- अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या मागणीवरून आधीच राजकीय गदारोळ उठलेला असताना आता थेट मंत्रिमंडळापुढे नामांतराचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा याला विरोध असताना असा प्रस्ताव आणला जात असेल तर त्यामागे मोठी राजकीय खेळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला तीव्र विरोध केलेला आहे. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात याचा समावेश नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असताना ‘सीएमओ महाराष्ट्र’ या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून ‘संभाजीनगर’ असा उल्लेख वारंवार करण्यात येत आहे. त्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली. ती ‘प्रिंटिंग मिस्टेक’ होती, असा खुलासा माहिती व जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री  असलम शेख यांनी केला. मात्र स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनीच गुरुवारी पुन्हा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करून  ट्विट करण्याची सूचना केली. त्यामुळे त्यांनी ही ठरवून केलेली कृती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह सेनेचे नेते कायम औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करत आले आहेत. त्यामुळे जे आम्ही कायम म्हणत आलो त्या भूमिकेत कसा बदल करणार? आम्ही संभाजीनगरच म्हणणार, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र माहिती खात्याच्या वतीने काढण्यात येणाऱ्या प्रसिद्धिपत्रकांमध्ये ‘औरंगाबाद’ असा उल्लेख करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत.  

मंत्र्यांना बैठकीला हजर राहण्याची सक्ती n कोरोनामुळे आठ-दहा महिने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्री ऑनलाइन सहभागी होत. n मात्र आता वर्षा, सह्याद्री किंवा मंत्रालयातच या बैठका होणार असून त्यासाठी सर्व मंत्र्यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागेल, असा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढला आहे. n त्यामुळे प्रशासनाच्या कामात गती येईल आणि निर्णय घेणे सोपे जाणार आहे. शिवाय व्हर्च्युअल मिटिंग नसल्याने गुप्तताही पाळली जाणार आहे.

सर्व काही महापालिका निवडणुकीसाठी! मुंबईसह औरंगाबाद आणि अन्य काही शहरांतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षांनी संभाजीनगरचा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे केला आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या सांगण्यानुसार, भाजपची औरंगाबादमधील स्पेस कमी करण्यासाठी ठरवून केलेली ही राजकीय खेळी आहे. त्याचाच भाग म्हणून अगदी सुरुवातीला औरंगाबाद शहरात ‘संभाजीनगर’ अशी अक्षरे ठिकठिकाणी लावली गेली. त्यासाठी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्याविषयी केंद्राला पत्र पाठवले. त्याचाच पुढचा भाग म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव आणला जाणार आहे. 

टॅग्स :Aurangabad renameऔरंगाबादचे-नामांतरAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस