शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 12:17 IST

Sanjay Raut PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य केले. मोदींनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले. राऊतांनी मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. 

Maharashtra Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पंतप्रधान मोदींचे राज्यातील दौरे वाढले आहेत. शनिवारी (५ ऑक्टोबर) ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला आज खासदार संजय राऊतांनी उत्तर देताना काही प्रश्न विचारले. जळगावमध्ये संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमातून काँग्रेसवर टीका केली. दिल्लीत पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस नेत्याचा सहभाग असल्याचं मोदी म्हणाले. त्याला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन रोज खोटं बोलतात. त्यांनी अकोल्यात अमली पदार्थांच्या बाबतीत चिंता व्यक्त केली. काँग्रेस अमली पदार्थाच्या पैशावर निवडणूक लढतोय, असे ते म्हणाले. मग गुजरातमधील मुद्रा पोर्ट ड्रग्ज पकडले. त्यावर मोदी बोलत नाही. हा पोर्ट कोणाचा आहे, तर गौतम अदानींचं. अफगाणिस्तानातून येणारे ड्रग्ज उतरवण्यासाठी मुद्रा पोर्टचीच निवड का केली? यावर मोदींनी बोललं पाहिजे", असे उत्तर राऊतांनी दिले. 

तुमच्या पायाशी कोण बसले आहे? राऊतांचा मोदींना सवाल

"महाराष्ट्रात ललित पाटील प्रकरण घडलं. ललित पाटीलला संरक्षण देणारी लोकं मिंधे आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाही. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमाला ते गेले. त्यांच्या व्यासपीठावर संजय राठोड होते. त्यांच्यावर पूजा चव्हाण हत्या/आत्महत्येचा आरोप आहे. त्या महिलेच्या घरातही नशेचे पदार्थ सापडले होते. तिथे या मंत्र्याचे जाणं-येणं होतं. तुम्हाला अमली पदार्थांची एवढी चिंता आहे, पण तुमच्या पायाशी कोण बसलं आहे?", असा सवाल राऊतांनी मोदींना केला. 

"नरेंद्र मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. मला चिंता वाटते की, मोदींना भाषणं कोण लिहून देतात? मोदींना जी संस्था किंवा व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत, ते मोदींची बेअब्रू करत आहेत. मोदींची हास्य जत्रा करत आहेत. अशा प्रकारची भाषणं लिहून ते देशाच्या पंतप्रधानांची अब्रू घालवत आहेत. म्हणजे काल काय बोलले, त्याचा आज पत्ता नाही. आज काय बोलले उद्या पत्ता नाही", अशी टीका संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाDrugsअमली पदार्थ