शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
3
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
4
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
5
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
6
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
7
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
8
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
9
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
10
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
11
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
12
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
13
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
14
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
15
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
16
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
17
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
18
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
19
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
20
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप

मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 4:00 PM

Sharad Pawar On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटक केले. याच कार्यक्रमात मोदींनी केलेल्या एका विधानावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. 

Sharad Pawar PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम दौऱ्यावर असताना काँग्रेसला लक्ष्य केले होते. बंजारा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानावर बोलताना शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पंतप्रधान पदाची आम्हाला बदनामी करायची नाही, पण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, असे पवार म्हणाले. 

मुंबई महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला शरद पवारांसह उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

मोदींच्या विधानावर बोट, शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान आले आणि बंजारा संबंधीची मते त्यांनी मांडली, पोहरादेवीला. त्यांनी एक विधान असं केलं की, बंजारा समाजासाठी काँग्रेसने आणि यापूर्वीच्या सरकारने कुठेही त्यांना संधी दिली नाही. या राज्याचे ११ वर्ष मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. ३ वर्ष सुधाकरराव नाईक होते. मनोहरराव नाईक हे मंत्रिमंडळात अनेक वर्ष होते", असे सांगत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.  

मोदींनी पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे -शरद पवार

"सगळ्या राज्याचं नेतृत्व करण्याच्या सबंधीची संधी काँग्रेसने बंजारा समाजाला दिली. त्यावर तो समाज कृतज्ञता व्यक्त करतो. आणि देशाचे पंतप्रधान, ते स्वतः येऊन सांगतात की, असं काही घडलेलं नाही. पंतप्रधान ही संस्था आहे, त्याची आम्ही बदनामी करू इच्छित नाही. पण, त्या पदावरील व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, ती ठेवण्याची भूमिका सुद्धा घेतली जात नाही", अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानाला उत्तर दिले.  

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

वाशिममध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'स्वातंत्र्यांनंतर काँग्रेसच्या सरकारांनी, काँग्रेसच्या धोरणांनी बंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष ज्यांनी ताब्यात घेतला त्यांचा विचार सुरुवातीपासून परदेशी राहिला. त्या लोकांनी बंजारा समाजाबद्दल नेहमी अपमानजनक वागणूक ठेवली." 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपाcongressकाँग्रेस