शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Video: शिवसेनेला धक्का! साताऱ्यातील नेता स्वगृही परतला; माण खटावमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

By प्रविण मरगळे | Updated: November 11, 2020 13:07 IST

Satara Ranjit Deshmukh joined Congress News: रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता.काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत फारकाळ जमलं नाही.

मुंबई – पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळतं. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सहकार क्षेत्रातील दबदबा निर्माण करणारे शिवसेनेचे युवा नेते रणजित देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दुष्काळ दौऱ्याचं योग्यरित्या त्यांनी नियोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसमधून बाहेर पडत रणजित देशमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. माण-खटाव यासारख्या दुष्काळी भागात जवळपास ७० चारा छावण्या सुरू करून रणजित देशमुखांनी मोठा दिलासा दिला होता. मात्र काँग्रेस विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत फारकाळ जमलं नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते कोणत्याच राजकीय पक्षात सक्रीय नव्हते. अखेर त्यांनी आज काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. रणजित देशमुख यांच्या प्रवेशामुळे साताऱ्यात काँग्रेसला बळ मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कराडमध्ये ३५ वर्षाचे राजकीय विरोधक पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या दिलजमाई झाली. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय. आज विलासकाका उंडाळकर यांच्या चिरंजीवानेही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.  

स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यातून जाण्याची भीती पाटील गटाच्या मनात तर पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील काँग्रेसच्या बांधणीसाठीची सुरुवात म्हणून मनोमिलनाला सहमती दर्शविली आहे. एवढाच यातून अर्थबोध घ्यावा लागेल. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असे काँग्रेसच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी पहिल्यांदा चरखा या चिन्हावर निवडणूक लढविली. १९८३-८४ आणि ८९ ला देखील त्यांनी प्रामाणिकपणे प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यासाठी काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याला विलासकाकांनी विरोध केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि विलासकाका मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. त्यांनी दिवंगत चिमणराव कदम, अभयसिंहराजे भोसले, शंकरराव जगताप, विक्रमसिंह पाटणकर, भाऊसाहेब गुदगे यांना ताकद दिली आणि जिल्हा परिषद ताब्यात घेतली. हे करत असताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना लांबच ठेवले. मात्र आता काँग्रेस हळूहळू संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRanjit Deshmukhरणजित देशमुखShiv SenaशिवसेनाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात