शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“रावसाहेब दानवेंची हकालपट्टी करा”; ‘त्या’ विधानावरुन शिवसेनेची PM मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 23:01 IST

भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी: भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेवरून महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. विशेष करून नारायण राणे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसून, शिवसेनेकडूनही नारायण राणे आणि भाजपला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. (shiv sena vinayak raut comment on raosaheb danve statement over rahul gandhi)

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी हे काही कामाचे नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे, बैलांसारखे राबत असल्याचे विधान केले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उदाहरण देत असल्याचे सांगितले होते. दानवेंच्या या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले असून, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. 

“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आलीय

भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. त्यातून त्यांची विकृती दिसून येते. दानवेंची बुद्धी भ्रष्ट झाली असून, त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, या शब्दांत विनायक राऊत यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाणार असल्याबाबत विनायक राऊत यांना विचारले असता, त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही. नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला काहीही अर्थ नाही. उलट राणे कोकणात तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत. अशा रितीने आशीर्वाद यात्रा काढून कोकणात शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. कोकणात कालदेखील शिवसेना होती. आजही आहे. तसेच ती उद्या देखील राहणार असून, नारायण राणेंच्या यात्रेला गंभीरपणे घेण्याचे कारण नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. 

“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका

दरम्यान, बाडगा हा नेहमी कोडगा असतो. राणेंकडून मंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. सत्तेसाठी द्रोह करणे हा नारायण राणेंचा स्थायीभाव आहे. राणेंनी सत्तेसाठी लाचार होत द्रोह केला असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खंबीर खांब असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे नाराज असून, त्यांना प्रत्येक फाईलवर सही करण्यासाठी 'मातोश्री'ची परवानही घ्यावी लागते. भाजपमध्ये आल्यास त्याचे स्वागत असल्याचे नारायण राणे यांनी वसई-विरार येथील जनआशीर्वाद यात्रेवेळी म्हटले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरीraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत congressकाँग्रेस