शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

पंजाब काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद, सिद्धू उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही, तर अमरिंदर सिंग म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:15 IST

Punjab Politics News: पंजाबमधी विधानसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. मात्र निवडणूक तोंडावर असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाब काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत.

चंदिगड - पंजाबमधी विधानसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. मात्र निवडणूक तोंडावर असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाबकाँग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. एकीकडे काँग्रेसकडून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद असाच सुरू राहिला तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो अशी चिंता काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे.  नवज्योतसिंग सिद्धू हे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र कॅप्टन अमरिंदर सिंग हे कुठल्याही परिस्थितीत सिद्धू यांना मंत्रिपदाखेरीज अधिक काही देण्यास इच्छुक नाही आहेत. दरम्यान, राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती पक्षनेतृत्वाला असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी सांगितले.    जाखड म्हणाले की, दोन्ही नेत्यामधील वाद शमवून पक्षसंघटनेतील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्षावर दबाव आणण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धूंकडून अशाप्रकारचे राजकारण खेळले जात आहे, असे पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थिती पक्षाने सिद्धूच्या म्हणण्याकडे फार लक्ष देता कामा नये. काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रभाव अमृतसरपुरताच मर्यादित आहे. तसेच त्यांनी तिथे भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी अमृतसर येथून पराभूत केले होते. 

दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसकडे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापेक्षा मोठा चेहरा सध्या नाही आहे. जर पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे दुर्लक्ष केले तर पक्षाला राज्यात विजय मिळवणे शक्य होणार नाही. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सध्यातरी पक्ष नेतृत्व कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर दबाव आणण्याच्या स्थिती नाही आहे. त्यामुळे काँग्रेस पुढील निवडणूक अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अंदाजानुसार पंजाबमध्ये सिद्धूंकडे फारसे पर्याय उपलब्ध नाही आहेत. शेतकरी आंदोलनामुळे राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही आहे. तर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये दुर्बळ होत चालला आहे. त्यामुळे पंजाबमधील पुढील विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत ही काँग्रेस आणि अकाली दल यांच्यातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कितीही नाराज असले तरी सिद्धू हे काँग्रेससोबतच राहतील, असा काँग्रेस नेतृत्वाचा अंदाज आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPoliticsराजकारण