शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

उमेदवारी जाहीर झाल्यावर सुनेत्रा पवार यांचा कांचन कुल यांना फोन आणि म्हणाल्या... (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:18 IST

बारामती मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार कांचन राहुल कुल आणि सुनेत्रा अजित पवार यांच्यामध्ये. कांचन या सुनेत्रा यांच्या चुलत भावाच्या कन्या आहेत.

पुणे : महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे राजकारण हे घराण्यांवर आधारीत असल्याचे म्हटले जाते.  महाराष्ट्रात तर राजकीय घराण्यांचे नातेसंबंधही असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. काहीवेळा वेगवेगळ्या पक्षांमुळे किंवा निवडणुकांमुळे नातेवाईकच एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले दिसतात. असंच एक नातं म्हणजे बारामती मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार कांचन राहुल कुल आणि सुनेत्रा अजित पवार यांच्यामध्ये. कांचन या सुनेत्रा यांच्या चुलत भावाच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर तात्काळ त्यांना फोन करून अभिनंदन केले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कुल यांचे लग्न सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने झाले आहे. राहुल कुल रासपमध्ये असले तरी कांचन यांचे वडील कुमाराजे निंबाळकर हे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत होते. आता ते आपल्या मुलीचा प्रचार करत आहेत. अगदी सुरुवातीला उमेदवारी जाहीर झाल्यावर काहीशा गोंधळलेल्या कुल आता जोरात प्रचार करत आहेत.

ज्यावेळी कांचन यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा त्यांचे पती राहुल कुल यांनी त्यांना मोबाईल बंद करून ठेवण्यास सांगितले. पुढील रणनीती ठरवली नसल्याने त्यांनी कांचन यांना मी येईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये अशाही सूचना दिल्या होत्या. दरम्यान सुनेत्रा पवार या कांचन यांना फोन करून अभिनंदन करण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेर फोन न लागल्याने त्यांनी राहुल यांना फोन केला. त्यानंतर कांचन यांनी सुनेत्रा यांना फोन केल्यावर त्यांनी अभिनंदन तर केलेच शिवाय शुभेच्छाही दिल्या. कांचन यांनी असे विरोधात लढायचे म्हटल्यावर त्यांनी ,'राजकारणात हे सर्व होत असते,''नाते नात्याच्या जागी आणि राजकारण राजकारणाच्या' हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbaramati-pcबारामती