शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 07:56 IST

एकाच दिवशी काँग्रेसकडून सर्जिकल स्ट्राइकचे दोन आकडे जाहीर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुरक्षा दलांच्या कामगिरीचं, सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकसारख्या कारवायांचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं वारंवार केला आहे. निवडणूक प्रचारांच्या भाषणांमध्ये अनेकदा एअर स्ट्राइकचा उल्लेख करणाऱ्या मोदींवर काँग्रेसनं टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं. मात्र आपल्या काळात दहशतवाद्यांना घरात घुसून मारल्याचं मोदी सांगत आहेत. यानंतर आता काँग्रेसनंदेखील सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा लावून धरल्याचं म्हणत यूपीए सरकारच्या काळात अशा कारवाया झाल्याचा दावा केला. मात्र या कारवायांच्या आकड्यात तफावत असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकवर जोर दिला आहे. यावरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींवर निशाणा साधला. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र आम्ही कधीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही, असं विधान सिंग यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत केलं. काल सकाळच्या सुमारास ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर दुपारी काँग्रेसनं एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पक्षाचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला.राजीव शुक्ला यांनी पत्रकारांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे आणि कधी करण्यात आली, याची तपशीलवार माहिती दिली. पूंछमधील भट्टल सेक्टर (19 जून 2018), केलमधील शारदा सेक्टर (30 ऑगस्ट-1 सप्टेंबर 2011), सावन पात्रा चेकपोस्ट (6 जानेवारी 2013), नाझपीर सेक्टर (27-28 जुलै 2013), नीलम व्हॅली (6 ऑगस्ट 2013) आणि 23 डिसेंबर 2013 रोजी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आल्याचं शुक्ला म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही, अशा शब्दांत शुक्ला यांनी मोदींना टोला लगावला. दुपारच्या सुमारास काँग्रेसकडून ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यानंतर संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत 'इंडिया टुडे'नं प्रसिद्ध केली. यात त्यांना मोदींच्या काळात झालेल्या दोन सर्जिकल स्ट्राइकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना राहुल यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात तीन सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं म्हटलं. 'आम्ही ही गोष्ट कधीच जाहीर केली नव्हती. कारण आम्हाला लष्कराच्या कामगिरीचं राजकारण करायचं नव्हतं. आम्हाला जवानांचा वापर करायचा नव्हता. ते (मोदी) जवानांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. आम्ही जवानांना सलाम करतो. त्यांचा आदर करतो. राजकीय लाभासाठी सैन्याचा वापर करुन आम्ही त्यांचा अपमान करत नाही,' असं राहुल गांधींनी म्हटलं.  

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक