शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 2:26 PM

Mamata Banerjee News: तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते.

ठळक मुद्देचार महिन्यांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की भाजपावर ओढवली तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकतेतीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे ममता बॅनर्जी ह्यासुद्धा राज्याच्या विधानसभेच्या सदस्य नाही आहेत

नवी दिल्ली - चार महिन्यांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की भाजपावर ओढवली आहे. तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे विधानसभेचे सदस्य नव्हते. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक होते. मात्र कोरोनामुळे राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक होत नाही आहे. त्यामुळे हे घटनात्मक संकट तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्याचे कारण ठरले आहे. आता तीरथ सिंह रावत यांच्या पदावर आलेले हे घटनात्मक संकट ममता बॅनर्जींचीही ( Mamata Banerjee) चिंता वाढवणारे आहे. ( then Mamata Banerjee may have to lose CM post too, alarm bell rings with resignation of Uttarakhand CM Tirath Singh Rawat)

तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते. तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे ममता बॅनर्जी ह्यासुद्धा राज्याच्या विधानसभेच्या सदस्य नाही आहेत. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे पश्चिम बंगालमध्ये जर पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत तर ममता बॅनर्जी यांच्यासमोरही तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो.

विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नियुक्त न होता केवळ सहा महिन्यांपर्यंत कुठलीही व्यक्ती मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावर राहू शकते. भारतीय राज्य घटनेतील कलम १६४ (४) नुसार मुख्यमंत्री किंवा मंत्री जर सहा महिन्यांपर्यंत राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य होऊ शकला नाही तर त्याच्या पदाचा कार्यकाळ हा सहा महिन्यांत संपुष्टात येईल.

तीरथ सिंह रावत हे १० मार्च २०२१ रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनले होते. ते राज्याच्या विधानसभेचे सदस्य नाही आहेत. १० सप्टेंबर २०२१ पूर्वी त्यांना विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक होते. राज्यात विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यावर निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. तसेच राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळही आता केवळ ८ महिन्यांचाच उरला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ४ मे २०२१ रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र ममतांच्या नंदिग्राम मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यामुळे कलम १६४ अन्वये त्यांना सहा महिन्यांच्या आत म्हणजे ४ नोव्हेंबर २०२१ पूर्वी विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक आहे. ते घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. सध्या पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त आहे. मात्र निर्धारित कालावधीत निवडणूक झाली तरच ममता बॅनर्जी यांनी विधानसभेचे सदस्य होऊन मुख्यमंत्रिपद वाचवता येईल. अन्यथा कोरोनामुळे निवडणूक घेणे निवडणूक आयोगाला शक्य झाले नाही तर ४ नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी यांनाही तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे राजीनामा द्यावा लागेल.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाPoliticsराजकारण