शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुठेही शाखा नाही, अशी काँग्रेसची स्थिती-फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 05:23 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संगमनेर येथील दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांसह जिल्हाध्यक्षांनी पदे सोडली. जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीही बरखास्त करण्याची नामुष्की आली. आता या पक्षाची आमची कुठेही शाखा नाही, अशी परिस्थिती झाली आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.शुक्रवारी श्रीरामपूरच्या थत्ते मैैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांचे भाषण व काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे काल्पनिक कथा व मनोरंजन बनले आहे. त्याचा वास्तवतेशी काहीही संंबंध नसतो. त्यामुळे मतदारांनी ते फार मनावर घेऊ नये. ते देशाच्या जवानांच्या कामगिरीवर शंका घेतात. बालाकोटमधील हवाई हल्ल्याची जगाला खात्री पटलेली असताना राहुल गांधी व पाकिस्तान हे दोघेच प्रश्न उपस्थित करतात. देशद्रोहासारखा कायदा हटविण्याची भाषा ते करीत आहेत. संविधान व तिरंग्याच्या अपमानासह, तसेच नक्षलवादी व माओवादी वृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करणारा कायदा मागे घेण्याची घोषणा करून काँग्रेस सुरक्षेच्या प्रश्नाशी खेळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने जनधन खाती उघडली. त्यात ८० हजार कोटी रूपये जमा केले. शौचालये, घरकुले, गॅस अनुदानाचे पैैसे त्यात थेट जमा केले जातात. त्यामुळे सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार थोपविण्यात यश आले आहे. काँग्रेस सरकार केवळ गरिबी हटावच्या घोषणा करते. गरिबांना ७२ हजार रुपये देऊ असे सांगते. मात्र राहुल यांचे आजोबा, आजी, वडील, आई यांना सत्ता देऊनही गरिबी दूर झाली नाही.‘विखेंना भाजपत घेऊ’डॉ. सुजय विखे म्हणाले, काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे व अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे हे दोघेही आमचेच उमेदवार आहेत. त्यांची किती ताकद आहे व ते किती पाण्यात आहे, हे आम्हाला चांगले माहीत आहे. आपल्या वडिलांना लवकरच पक्षात घेऊ. डॉ. विखे यांच्या या वक्तव्यामुळे राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करणार, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी दुपारी बारा वाजता लोणीत राजकीय भूमिका स्पष्ट करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस