मुंबई : धारावीतल्या लोकांना चावणारा डास मातोश्रीवर येऊन मलाही चावतो, त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे, असे विधान धारावीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर काँग्रेसने शिवसेनेवर शालजोडीतून टीकास्त्र सोडले.या आधी मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता, आम्ही अल्पज्ञ वृथा मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो, परंतु मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढविण्यासाठी शिवसेना कार्यरत होती, हे आम्हाला आत्ता समजले. त्यामुळे उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही, याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल द्या; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 06:54 IST