शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल द्या; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 06:54 IST

उद्धव ठाकरेंच्या विधानावर काँग्रेसची टोलेबाजी

मुंबई : धारावीतल्या लोकांना चावणारा डास मातोश्रीवर येऊन मलाही चावतो, त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे, असे विधान धारावीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर काँग्रेसने शिवसेनेवर शालजोडीतून टीकास्त्र सोडले.या आधी मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता, आम्ही अल्पज्ञ वृथा मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो, परंतु मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढविण्यासाठी शिवसेना कार्यरत होती, हे आम्हाला आत्ता समजले. त्यामुळे उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही, याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

'डासभाऊ’ हा शोध लावणाऱ्या ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे. याकरिता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रांतील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढविण्यासाठी नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी या अगोदर अगरबत्तीसह विविध उत्पादने वापरून डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना पायबंद कसा घालता येईल, याकडे जनतेचा प्रयत्न असायचा, परंतु डासांचा एवढा महान उपयोग असू शकतो, हे कळल्यानंतर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावनासारख्या महान उद्देशांसाठी आता या उत्पादनांवर बंदी घालायलाच हवी, परंतु नोबेल पुरस्कारासाठी अडथळा निश्चित आहे. एकच डास दोन व्यक्तींना चावल्याने त्यांच्यात बंधुभावाचे नाते तयार होते, असे उद्धवजींनी आपल्याला सांगितले आहे. हा वैश्विक विचार आहे, असा टोला ही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना