शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

ऊर्मिलाच्या प्रवेशामुळे भाजपपुढे तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:55 IST

राड्यामुळे वाढली चुरस; एकतर्फी लढत होण्याचे अंदाज मिळाले धुळीस

- सचिन लुंगसे२०१४ मध्ये चार लाखांच्या मताधिक्याने जिंकलेले भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना या वेळी आव्हान दिले आहे ते अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी.शेट्टी यांच्याकडे अनुभव, संघटनात्मक ताकद असली, तरी निवडणुकीच्या रिंगणात आयत्यावेळी उतरलेल्या ऊर्मिला मांडत असलेले मुद्दे, त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी दोनदा राडा केल्याने त्या पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे ही लढत एकतर्फी न होता, चुरशीची होईल, असे स्पष्ट दिसू लागले आहे.काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांच्या कुटुंबाची वैचारिक बैठक, सामाजिक कामाबद्दल असलेली जाण, विषय-मुद्दे मांडण्याची हातोटी यामुळे; तसेच अभिनेत्री असल्याने त्यांच्याविषयी आकर्षण आहे. ते त्यांच्या प्रचारसभा-चौकसभांत दिसते. मनसेसारख्या मुंबईत सतत चर्चेत असलेल्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. त्या पक्षाच्या मतदाराने खरोखरीच मातोंडकर यांना बळ दिले आणि त्याचपद्धतीने आघाडीतील राष्ट्रवादीनेही काम केले, तर शेट्टी यांचे मताधिक्य दीड-दोन लाखांनी घटू शकते, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा आहे. सर्वसामान्यांत मिसळणे, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा, झोपड्यांसह कच्च्या वस्त्यांतील मुद्दयांची हाताळणी, त्याचवेळी उच्चभ्रू मतदारांना दिलेला विश्वास, रेल्वेसह अन्य प्रवाशांच्या प्रश्नांबाबत चर्चा या पद्धतीने त्यांच्या प्रचाराची आखणी दिसून येते.भाजपच्या संघटनात्मक ताकदीपेक्षा उर्मिला यांचे मुद्दे, ग्लॅमर सरस ठरू लागताच त्यांच्या प्रचारसभेत दोन वेळा घुसून भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ, त्यावरील आरोप-प्रत्यारोप यामुळे ही निवडणूक भाजपसाठी एकतर्फी उरलेली नाही, हे स्पष्ट दिसते. त्यामुळे मतदार बॉलीवूडला प्राधान्य देतात की, आहे त्याच उमेदवाराचा पुन्हा विचार करतात यावर येथील निकाल अवलंबून आहे.हिंमत असेल तर केलेल्या कामाच्या बळावर, मेरिटवर निवडणूक लढवावी. काँग्रेसला आता लक्षात आले आहे की, त्यांचे डिपॉझिटही वाचणार नाही. या मतदारसंघातील लोक समजूतदार आहेत. कोण खरे आणि कोण खोटे? हे सगळे लोकांना कळते आहे. देश मोदीमय झाला आहे. त्याचा फायदा मिळेल.- गोपाळ शेट्टी, भाजप.पाच वर्षांत देशातील वातावरण कमालीचे वाईट झाले आहे. या परिस्थितीत माझे काम, मला मिळणारा पाठिंबा हेच माझ्या विरोधकांना उत्तर आहे. भावनिक मुद्दे हाताळणे ही कामे भाजपची आहेत. मागील साडेचार वर्षांत त्यांनी हे काम उत्तम केले आहे. मी माझ्या आताच्या कामावर विश्वास ठेवते.- ऊर्मिला मातोंडकर, काँग्रेसकळीचे मुद्देझोपड्यांच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर ऊर्मिला यांनी शेट्टी यांना कोंडीत पकडले आहे. त्या मतदारावर लक्ष केंद्रित केले आहे.पश्चिम उपनगरातील रेल्वेचे न सुटलेले प्रश्न, हव्या त्या प्रमाणात न मिळालेल्या सुविधाही मतदारांच्या केंद्रस्थानी आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरGopal Shettyगोपाळ शेट्टीmumbai-north-pcमुंबई उत्तर