शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 03:53 IST

यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती.

- एन. के. सिंहलखनऊ : यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती. या वेळी तसेच घडणार की समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोक दल यांची आघाडी भाजपला चितपट करेल, यावर केंद्रातील सत्तेची गणिते ठरणार आहेत.अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर ११ महिन्यांनी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या वेळी उत्तर प्रदेशसह देशभर हिंदुत्वाचे वातावरण होते. अशा स्थितीत सप व बसप यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या होत्या. त्या वेळी सप-बसप आघाडीला १७६ जागा (सपला ११0 व बसपला ६७) मिळाल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी २१३ जागांची गरज होती. भाजपला १७६ जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी सपला २१.८0 टक्के तर बसपला १९.६४ टक्के मते मिळाली होती. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत दोघांच्या मतांमध्ये मिळून १२ टक्क्यांची वाढ दिसली होती. भाजपला मिळालेली मते ३२.५२ टक्के इतकी होती.त्याच सप-बसपची आता आघाडी आहे. त्यात रालोदही सहभागी आहे. त्यानंतर २0१४ च्या लोकसभा व २0१७ सालच्या विधानसभा निवडणुकांत या दोन पक्षांना मिळालेली मते पाहिली तर ती भाजपच्या आसपास वा त्याहून अधिकच आहेत. हे गणित लक्षात घेतले, तर यंदा उत्तर प्रदेशात भाजपला ५0 जागांचे नुकसान होऊ शकते. म्हणजेच २0१४ पेक्षा ५0 जागा कमी मिळू शकतात. हा फॉर्म्युला यशस्वी झाला, तर अन्य राज्यांतील प्रादेशिक पक्षही त्याची पुनरावृत्ती करू शकतील.भाजप सत्तेवर आल्यानंतर गाय, बैल, भारतमाता यांच्या नावाने अल्पसंख्याक, दलित व मागास जातींमध्ये भीतीची भावना निर्माण करण्यात आली. दलितांना लग्नाची वरात आपल्या घरासमोरून काढू नये, असे उच्च जातींच्या मंडळींनी बजावल्याचीही काही उदाहरणे आहेत.एके ठिकाणी घोडीवर दलित वर बसल्याने संतापून उच्च जातींतील एकाने त्याच्यावर बंदूकच रोखली होती. त्यामुळे या जाती भाजपवर नाराज आहेत. भाजप आपले आरक्षण पूर्णपणे रद्द करेल, अशीही भीती मागास जातींमध्ये आहे. त्यामुळे या जाती सप-बसपच्या मागे उभ्या दिसत आहेत. केवळ मतांची टक्केवारीच नव्हे, तर जे रसायन तयार झाले आहे, तेही भाजपच्या विरोधात दिसत आहे. आपल्याकडे फर्स्ट पास्ट द पोस्ट नावाचा एक खेळ आहे. त्यात खांबापाशी जो आधी पोहोचतो, तोच जिंकतो. निवडणुकीच्या खेळात मात्र दोन अधिक दोन म्हणजे चारच नव्हे, तर आठही होऊ शकतात.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)>सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपले वडील मुलायमसिंह व बसपच्या प्रमुख मायावती यांच्यातील २५ वर्षांपासूनचे वैर संपवून दाखवले आहे. त्यांच्यातील हा समझोता निवडणूक निकालांत त्यांना फायदा मिळवून देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.दोन प्रादेशिक पक्षांतील हा समझोताच मुळी देशातील राजकारणातील नवा व वेगळा प्रयोग आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी