शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

चार राज्यांतील मतदान दुसऱ्या टप्प्यानंतर संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:50 IST

द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे करुणानिधी व जयललिता हे नेते नसताना या दोन्ही पक्षांच्या दुसºया फळीतील नेत्यांमध्ये येथे चुरशीची लढत होत आहे.

चेन्नई : द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे करुणानिधी व जयललिता हे नेते नसताना या दोन्ही पक्षांच्या दुस-या फळीतील नेत्यांमध्ये येथे चुरशीची लढत होत आहे. सत्ताधारी असलेल्या अण्णाद्रमुकने भाजप समवेत आघाडी केली आहे. याशिवाय पीएमके, डीएमडीके आणि तमिळ मनिला कॉँग्रेस हे पक्षही या आघाडीमध्ये सामील आहेत. याच्या विरोधामध्ये द्रमुकने कॉँग्रेस ,डावे पक्ष, व्हीसीके, एमडीएमके आणि मुस्लीम लीग यांच्यासमवेत धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीची स्थापना केली आहे.जयललिता यांच्या निधनानंतर दुभंगलेल्या अण्णाद्रमुकच्या दोन गटांमध्येही आपणच सच्चे वारसदार दाखविण्याची स्पर्धा आहे. टीटीव्ही दिनकरन् यांच्या नेतृत्वाखालील एएमएमके आणि पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक यांच्यातील लढतही बघण्यासारखी आहे. याशिवाय राजकारणात आलेले अभिनेते कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम(एमएनएम) हा पक्षही प्रथमच मतदारांना सामोरा जात आहे. यामुळे येथील लढती रंगतदार ठरणाºया आहेत.>दिग्गज नेते नसताना...अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन पक्षांचे सर्वेसर्वा असलेले जे. जयललिता आणि एम. करुणानिधी हे नेते काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांच्या दुसºया फळीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. या निवहणुकीत या दोन्ही द्रविडियन पक्षांचे नेते नसल्याने राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.>पुद्दुचेरी । एकमात्र जागेसाठी होणार बहुरंगी लढतपुडुच्चेरी : या केंद्रशासित प्रदेशामध्ये सत्ताधारी असलेल्या कॉँग्रेसला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्री नारायण स्वामी यांनी या निवडणुकीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मागील निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या एआयएनआरसीने उमेदवार बदलला आहे. या निवडणुकीमध्ये त्यांनी के. नारायण स्वामी यांना तर कॉँग्रेसने व्ही. वैदलिंगम यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम(एमएनएम) या पक्षानेही एम.ए.एस. सुब्रमण्यम् यांना मैदानामध्ये उतरविले आहे. याशिवाय अन्य काही स्थानिक पक्षांचे उमेदवारही बहुरंगी लढत होत आहे.>पूर्व त्रिपुरामधील मतदान आता २३ एप्रिल रोजीनवी दिल्ली : पूर्व त्रिपुरा मतदारसंघामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री उशिरा गुरुवारी होणारे पूर्व त्रिपुरा मतदारसंघातील मतदान पुढे ढकलल्याची घोषणा केली. आता हे मतदान २३ एप्रिल रोजी होईल. याशिवाय आयोगाने त्रिपुराचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) राजीव सिंग यांची तातडीने बदली केली आहे. त्यांच्याजागी आयोगाने व्ही. एस. यादव यांची नियुक्ती केली आहे. कॉँग्रेस आणि माकपाने कायदा आणि सुव्यवस्था नसल्याच्या अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या.>मणिपूर । भाजप आणि कॉँग्रे्रेसमध्ये थेट लढाईइम्फाळ : मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागा असून या दोन्हीसाठीचे मतदान पूर्ण होत आहे. राज्यामध्ये भाजप आणि कॉँग्रेसने या दोन्ही जागांसाठी उमेदवार दिले आहेत. याशिवाय जेडीयू, राष्टÑवादी कॉँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांनीही आपापले उमेदवार काही जागांवर दिले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने येथील सत्ता अन्य पक्षांच्या मदतीने मिळविली आणि कॉँग्रेसकडून हे राज्य ताब्यात घेतले. या निवडणुकीमध्येही भाजप आपला विजयरथ पुढे नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019