शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘ड्रग्ज अ‍ॅडिक्ट’ला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?, सचिन सावंतांचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 14:24 IST

Sachin Sawant : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला कंगना राणौतला पाठिंबा दिल्याचे स्मरण करून देत खडेबोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडले आहे.

मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नसल्यामुळे शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेत शनिवारी देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

या चक्का जाम आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या शेतकरी आंदोलनाबद्दल भाजपाच्या नेत्यांकडून खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपालाकंगना राणौतला पाठिंबा दिल्याचे स्मरण करून देत खडेबोल सुनावले आहेत.

सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?,” असा सवाल सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली. मात्र, अद्याप तोडगा निघाला नसून शेतकरी नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ठाम आहे. 

तर शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजपाच्या काही नेत्यांकडून करण्यात आला होता. तसेच, अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा समावेश असल्याचे म्हटले होते. याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर म्हणून केली होती आणि मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला सुनावले आहे.  

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतKangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेसPoliticsराजकारण