शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

West Bengal Election : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल; म्हणाले,"बेगम ममता बॅनर्जी पश्चिम बंगालला बनवतील मिनी पाकिस्तान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 09:12 IST

West Bengal Election 2021 : सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.

ठळक मुद्देसुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत.यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. सोमवापी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर पलटवार केला. "ममता बॅनर्जी यांना ईद मुबारक म्हणण्याची सवय आहे. म्हणून त्यांनी होळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी होली मुबारक असं म्हटलं. बेगमना मतदान करू नका. जर तुम्ही त्यांना मतदान केलं तर पश्चिम बंगाल मिनी पाकिस्तान बनेल. बेगम अचानक बदलल्या आहेत आणि त्या आता मंदिरात जाऊ लागल्या आहेत, कारण त्यांना पराभवाची भीती आहे," असं म्हणत अधिकारी यांनी निशाणा साधला."जे लोकं आज या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आले आहेत ते बाहेरून आले आहेत आणि या ठिकाणी तात्पुरते राहिले आहेत. निवडणुकीनंतर ते उडून जातील. परंतु आपण या ठिकाणचे स्थायी निवासी आहोत आणि लोकांच्या सुख दु:खासाठी काय उपलब्ध असू," असं अधिकारी म्हणाले.  ममता बॅनर्जी यांची एक कथित ऑडिओ क्लिप लीक झाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. "ऑडिओमध्ये ऐकू शकतो. त्या नंदीग्राममध्ये पहिलेही येत नव्हत्या आणि नंतरही येणार नाहीत. अशात त्या सातत्यानं खोटं बोलत आहेत की नंदीग्रामच्या लोकांसाठी त्या कायम उपलब्ध असतील. परंतु त्या नंदीग्राममध्ये कधी येणार नाहीत हे सत्य आहे," असंही ते म्हणाले. ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. शाह यांच्या या दाव्यावरून ममता बॅनर्जी यांनी शाह यांना टोला लगावला आहे. चंदीपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामं करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी