शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 14:09 IST

: देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.

ठळक मुद्देमुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला माफी मागण्याचा विषय

कोल्हापूर : देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पश्चिम बंगालमधील निकालानंतर टीका केली. त्यावर पाटील यांनी भुजबळ यांचा तिखट शब्दात समाचार घेतला. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेवून पाटील यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.आमदार पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या गायकवाड अहवालाचे इंग्रजी भाषांतर करताना काही चुका झाल्यात का हे देखील स्पष्ट व्हायला हवे. याबाबत मी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजूनही मराठा आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्याच कोर्टात आहे हे लक्षात घेवून राज्य सरकारने कार्यवाही करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण चांगल्या पध्दतीने काम करू शकू असे वाटल्याने त्यांनी पहिल्यांदा सारथी आणि नंतर आण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्या नियोजन विभागातंर्गत घेतले आहे. आता बघू ते काय करतात ते.गडकरींना जमले ते शासनाला का नाहीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेल्या औषध कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठबळ दिले आणि तेथून आता ३० हजार रेमडेसिविर इंजक्शन्सचे उत्पादन सुरू झाले. जे गडकरींना जमते ते राज्य शासनाला का जमत नाही असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.गायकवाडना एकदा तरी बोलावले काआम्ही नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी गायकवाड यांनी याकामी इतके झोकून देवून काम केले की त्यांच्या डोळ्याची पापणी पॅरालाईज झाली. माझा एक अधिकारी त्यांना रोज रूग्णालयात नेवून आणत असे. तिथे उपचार झाले की पुन्हा ते कार्यालयात येवून काम करत होते. इतके योगदान देणाऱ्या गायकवाड यांना एकदाही चर्चेसाठी बोलवावे असे गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना का वाटलं नाही अशीही विचारणा पाटील यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर