शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

दिंडोरीत माकपच्या उमेदवारीचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 05:05 IST

युती-आघाडीकडून आयात उमेदवार; राजी-नाराजीचा दोघांनाही फटका

- श्याम बागुलदिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत देत असलेल्या युती व आघाडीने आयात उमेदवारांनाच संधी दिल्याने दोन्ही पक्षांना राजी-नाराजीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, त्यात माकपने उमेदवारी जाहीर करून दोन्ही पक्षांपुढे पेच निर्माण केला आहे. माकपची उमेदवारी नेमकी कोणाला तारते आणि कोणाला मारते यावरच युती व आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.आदिवासी व बिगर आदिवासी मतदारांचा समावेश असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ऐवजी गेल्या निवडणुकीत भाजपविरुद्ध लढणाऱ्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्टÑवादीने डॉ. भारती पवार यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली.ज्याप्रमाणे भाजपने उमेदवार बदलल्यामुळे नाराजीची भावना आहे, त्याचप्रमाणे, राष्टÑवादीमध्येदेखील आयात उमेदवारामुळे नाराजी बोलून दाखविली जात आहे. नेमका त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांनी चालविला आहे.आदिवासी कोकणा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातील प्रमुख तिन्ही उमेदवार त्याच समाजातील आहेत, शिवाय तिघांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. डॉ. भारती पवार यांचे सासरे दिवंगत ए. टी. पवार हे आठ वेळा आमदार राहिले आहेत. तर धनराज महालेयांचे वडील दिवंगत हरिभाऊ महाले हे तीन वेळा खासदार व दोन वेळा आमदार राहिले आहेत. जिवा पांडू गावित सात वेळा सुरगाणा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार राजकीयदृष्ट्या ताकदीचे असल्याने कोण बाजी मारतो याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आघाडीसाठी शरद पवार तसेच माकपासाठी सीताराम येचुरी यांची सभा या मतदारसंघात झाली. माकपाने मतदारसंघात जागर यात्रा काढून वातावरण निर्मिती केली आहे. प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत असली, तरी कोण कोणाची मते खातो, यावर गणिते अवलंबून आहे. तूर्त प्रत्येकाची लढाई जिंकण्यासाठी व प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी आहे.गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घरोघरी स्वच्छतागृह उभारण्यास प्रोत्साहन देऊन माता, भगिनींची अब्रू वाचविली. शेतमालाला भाव व शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले. आयुष्यमान योजनेने गरिबांचा उपचार खर्च उचलला.- डॉ. भारती पवार, भाजपसर्वच पातळीवर सरकार अयशस्वी ठरले. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. उलट नोटबंदी, जीएसटीने जनता, शेतकºयांची फसवणूक केली. बेरोजगारी वाढविली. फसवे सरकार गेले पाहिजे.- धनराज महाले, राष्टÑवादीकळीचे मुद्देशेतमालाचे कोसळलेले भाव, गुजरातला वाहून जाणारे पाणीखासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भाजपच्या मदतीविषयी साशंकता, कॉँग्रेस कार्यकर्ते प्रचारापासून दूर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019dindori-pcदिंडोरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस