शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 13:04 IST

Remdesivir News : पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई - कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येत असलेल्या रेमडेसिविरवरून (Remdesivir News) सध्या राज्यातील राजकारणामध्ये मोठा वाद रंगला आहे. त्यातच काल रात्री एका फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याने त्यावरून भाजपा (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. (Coronavirus in Maharashtra ) दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. (Why did the Leader of the Opposition go to rescue the pharma company owner? Nawab Malik again made serious allegations on BJP)

नवाब मलिक म्हणाले की, काल रात्री औषधांचा साठा आहे अशी खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ही बाब समजताच विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि आमदार पराग अळवणी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना जर माहिती मिळाली तर ते तपास करतात. मग राजेश डोकानियांना सोडवण्यासाठी राज्यातले दोन दोन विरोधीपक्षनेते आणि दोन  आमदार का गेले होते. काही दिवसांपूर्वी हेच भाजपाचे नेते दीव दमणला गेले होते. रेमडेसिविरचे आम्ही आणून वाटप करू, असे त्यांनी सांगितले होते. भाजपाची लोकं साठा मिळू नये यासाठी प्रयत्न करताहेत का. रेमडेसिविरचा साठा करून स्वत; वाटण्याची किंवा विकण्याची भूमिका घेताहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.  

दरम्यान, एफडीएने रात्री आदेश दिल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना माहिती घेऊन सोडण्यात आलं. तसेच गरज वाटल्यास बोलावले जाईल असे सांगितले. पोलीस हे जनतेसाठी काम करतात. साठा असेल तर जप्त करून जनतेला देण्याचं का काम करते. मग यांना चौकशीसाठी बोलावलं तर भाजपावाले  का घाबरतात. वकिलीसाठी का जातात. देवेंद्रजी वकील आहेत. ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की संबंध असल्याने वचाव करत आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस एफडीए कारवाई करू शकतात. मात्र फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी भाजपाचे नेते का धावून गेले, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. याच्यामागचं काय राजकारण आहे भाजपाने स्पष्ट करावं, असे आव्हानही मलिक यांनी दिले.  देशात सात कंपन्यांना वितरण वितरण आणि विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील दोन कंपन्यांना परदेशात विक्रीची करण्याचा अधिकार देण्यात आले आहे. तर सतरा कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. ते उत्पादन करून या दोन कंपन्याना देऊ शकतात. या सात कंपन्यांना स्वत: उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातबंदी झाल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विक्रीसाठी परवानगी द्या म्हणून महाराष्ट्र सरकारकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी ब्रुक फार्माचे राजेश डोकानिया हे दरेकरांसोबत शिंगणेंना भेटले होते. परवानगी मिळाल्यास रेमडेसिविर देऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली होती, असेही मलिक यांनी यावेली सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPraveen Darekarप्रवीण दरेकर