शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या असताना नव्या संसदेवर खर्च कशाला?: कमल हसन

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 14:44 IST

सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे. 

ठळक मुद्देनव्या संसदेच्या निर्माणावर कमस हसन यांचा आक्षेपकोरोना काळात खर्चीक प्रकल्प राबविण्याची गरज काय?, हसन यांचा सवालपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं नव्या संसदेचं भूमिपूजन

नवी दिल्लीनव्या संसदेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकताच पार पडला. अभिनेते आणि मक्कल निधी माईम पक्षाचे नेते कमल हसन यांनी या नव्या संसदेच्या गरजेबाबतचे काही सवाल उपस्थित केले आहेत. 

सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे. कमल हसन यांनी एक ट्विट केलं आहे. "चीनच्या भिंतीची निर्मिती होत असताना हजारो लोक मारले गेले. पण त्यावेळी प्रशासनानं दावा केला होता की लोकांच्या सुरक्षेसाठी भिंत उभारणं गरजेचं होतं. आता भारतात नव्या संसद भवनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. देशात कोरोनाकाळात अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना भूकेलं राहावं लागलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मग अशावेळी नव्या संसदेची गरज आहे का?", असं कमल हसन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. संसद भवनाची निर्मिती हा खरंतर २० हजार कोटींच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. सरकारच्या योजनेनुसार चार मजली संसद भवन हे ६४,५०० वर्ग मीटर परिसरात तयार केले जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच २०२० साली नव्या संसदेचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. नव्या संसदेत लोकसभेच्या सभागृहात ८८८ इतकी आसन व्यवस्था असणार आहे. तर सेंट्रल हॉलमध्ये १२२४ इतकी आसन क्षमता असणार आहे. अत्याधुनिक सुविधांसह भूकंप विरोधी इमारतीचं बांधकाम असणार आहे.  

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा