शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार? एनडीएची ताकद वाढणार; मांझींच्या ऑफरनंतर चर्चेला उधाण

By बाळकृष्ण परब | Updated: November 13, 2020 09:49 IST

Bihar Assembly Election News : बिहारमध्ये सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देहिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या ऑफऱमुळे नव्या चर्चेचाल तोंड फुटले आहेमांझी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहेबिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या आहेत

पाटणा - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत विजय मिळवला आहे. सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे. एकीकडे तेजस्वी यादव यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला असतानाच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या ऑफऱमुळे नव्या चर्चेचाल तोंड फुटले आहे.बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे नेते जीननराम मांझी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता बिहारमध्येही काँग्रेसमध्ये फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे निवडून आलेले आमदार गोवा, गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये पक्ष सोडून भाजपामध्ये गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मांझी यांच्या ऑफरमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडणे स्वाभाविक आहे.बिहार काँग्रेसमध्येही यापूर्वी फूट पडली होती. २०१७ मध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेत पुन्हा एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह काही नेते काँग्रेस सोडून जेडीयूमध्ये आले होते. सध्या अशोक चौधरी हे जेडीयूचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच नितीश कुमार यांचे खास व्यक्ती बनलेले आहेत. 

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये भाजपाने ७४, जेडीयूने ४३, हम पक्षाने ४ आणि व्हीआयपी पक्षाने ४ जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. त्यामध्ये आरजेडीला ७५, काँग्रेसला १९ आणि डाव्या पक्षांना १६ जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चाcongressकाँग्रेस