शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

राज्यात आगामी वर्षात ११२ लाख टन साखर निर्मिती होणार ; इथेनॉल ऊत्पादन वाढविण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 4:22 PM

साखरेचे उत्पादन वाढले मात्र साखर कारखान्यांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची चिन्हे आहेत.

पुणे: राज्यात ऊसाचे क्षेत्र यंदा वाढले आहे. त्यामुळे साखरेचे ऊत्पादन तब्बल ११२ लाख टन होईल. साखरेचा खप कमी झाल्याने यातून साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.साखर आयूक्त कार्यालयाकडून पुढील वर्षीच्या गाळप हंगामाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार १२.३२ लाख हेक्टरवर ऊस ऊभा आहे. त्यातून १०९६ लाख टनाचे गाळप होईल. त्यामधून ११२ लाख टन साखर निर्माण होईल. १० लाख टन ऊस इथेनॉलसाठी शिल्लक ठेऊन हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी किमान १३० कोटी इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट असणार आहे. 

मागील वर्षी १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. त्यातून गाळप होऊन १०६ लाख टन साखरचे ऊत्पादन झाले. त्याआधीची सुमारे ४० लाख टन साखर कारखान्यांकडे शिल्लक आहे. निर्यातीसाठी अनूदान द्यावे लागत असल्याने केंद्र सरकार देशासाठी ६० लाख टनांच्या पुढे कोटा वाढवून द्यायला तयार नाही. देशात आरोग्यविषयक जागरूकता  वाढली आहे, त्यामुळे साखरेचा अपेक्षित खप होत नाही. कारखान्यांना साखर गोडाऊनमध्ये शिल्लक ठेवावी लागते. यातून सध्याच साखर कारखान्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या वर्षाच्या साखर ऊत्पादनातून त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

--// 

साखर उद्योगाला आता अपरिहार्यपणे इथेनॉल निर्मितीकडे वळावे लागेल. त्यादृष्टीने नियोजन सुरूही झाले आहे. मागील वर्षी ६ लाख टन गाळप इथेनॉलकडे वळवून १०८ कोटी लिटर इथेनॉलचे उद्दिष्ट गाठले गेले. पुढील वर्षी १० लाख टन गाळप साखरेऐवजी इथेनॉलकडे वळवून १३० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उद्दिष्ट दिले जाईल अशी शक्यता आहे. शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकार