शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

किल्ले शिवनेरीवर १२ हजार लिटर क्षमतेचा ‘आरओ प्लांट’; कचरामुक्त अभियानाला अखेर यश

By श्रीकिशन काळे | Updated: February 25, 2025 16:12 IST

गडावरच पिण्याचे पाणी पर्यटकांना मिळणार असल्याने प्लास्टिक बाटल्यांचा कचरा साठणार नाही

पुणे : गडकिल्ल्यांवर गेल्यानंतर अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या पाहायला मिळतात. त्यामुळे गडाचा परिसर विद्रूप हाेत असे. त्यावर उपाय म्हणून आता वन विभागाच्या वतीने किल्ले शिवनेरीवर ‘आरओ प्लांट’ बसविण्यात येत आहे. तसेच प्लास्टिकची बाटली गडावर न्यायची असेल तर त्यासाठी नोंदणी करून न्यावी लागते. यामुळे पर्यटकांना आता कुठेही प्लास्टिकची बाटली फेकून देता येणार नाही.

अनेक वर्षांपासून गडावर प्लास्टिक बाटल्यांचा खच पडत होता. त्या पाहून अनेक शिवप्रेमी संस्थांनी त्या संकलित करण्याचा उपक्रम राबविला. आजही अनेक संस्था त्या प्रकारचे काम करून गड स्वच्छ ठेवतात; पण यावर ठोस धोरण करण्यासाठी सरकारने गडावर प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घातली. गडावरच पिण्याचे पाणी पर्यटकांना मिळणार आहे. परिणामी प्लास्टिक बाटल्यांचा कचरा साठणार नाही.

याविषयी द ट्रास ग्रुपच्या वतीने केदार पाटणकर गेली अनेक वर्षे गडांवरील प्लास्टिक बाटल्यांच्या कचऱ्याबाबत जनजागृती करत आहेत. त्यांच्या या अभियानाला अखेर यश आले. आता शिवनेरीवर पाण्याची सोय होत असून, प्लास्टिकच्या बाटल्यांवरही बंदी आली. सध्या शिवनेरीवर जाताना पायथ्याला पर्यटकांना जर प्लास्टिकची बाटली सोबत न्यायची असेल तर त्यांना नाव नोंदणी करून ५० रुपये अनामत रक्कम भरावी लागते. त्यांनी बाटली गडावरून खाली आल्यावर परत दिली की, त्यांना अनामत रक्कम परत दिली जाते. ज्यांना बाटली न्यायची नसेल, त्यांच्यासाठी वर पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

किल्ले शिवनेरीवर बालेकिल्ल्याच्या ठिकाणी १२ हजार लिटर क्षमतेचा ‘आरओ प्लांट’ बसविण्यात येईल. तसेच खाली पायथ्याला पाच पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामधून पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी घेता येईल. - अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर वन विभाग

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरPlastic banप्लॅस्टिक बंदीWaterपाणीpollutionप्रदूषणFortगड