शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांना हवेत २०० कोटी; आपत्ती सौम्यीकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:54 AM

जिल्ह्यातील ७२ दरडप्रवण गावांपैकी ४४ गावात संरक्षण भिंतीसह अन्य आपत्ती नियंत्रणासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे....

पुणे : केंद्र आणि राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या विविध आपत्तींचे सौम्यीकरण करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाद्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ७२ दरडप्रवण गावांपैकी ४४ गावात संरक्षण भिंतीसह अन्य आपत्ती नियंत्रणासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत या गावात कोणती कामे करायची आहेत, त्याचे प्राधान्यक्रम ठरवा, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणा आणि अन्य यंत्रणांनी जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात ७२ गावे दरडप्रवण असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या विविध आपत्तींचे सौम्यीकरण करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाद्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातही उपाययोजना राबवायच्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याचा आराखड्यात समावेश केला आहे. त्यानुसार या ७२ गावांतील उपाययोजनांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या ७२ पैकी ४४ गावांच्या संदर्भातील विविध आपत्तीविषयक कामांसाठीचा ६८ कोटी १७ लाख रुपयांचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला होता. तसेच अन्य गावांतील सुमारे ३२ प्रकारच्या विविध कामांसाठी ७० कोटी २७ लाख रुपयांचा प्रस्तावही सरकारला पाठवला आहे.

या उपाययोजनांमध्ये संरक्षक भिंती उभारणे, भराव करणे, उतार स्थिरीकरण, लहान पुलाचे बांधकाम यांसारख्या कामांचा यात समावेश आहे. जुन्नर तालुक्यातील मीना नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम, इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथील नीरा नदी काठ परिसरात संरक्षण भिंत बांधणे, उजनी धरणातील बॅकवॉटरमधील गावांना जोडणाऱ्या इंदापूर शहर ते गलांडवाडी, बनकरवाडी, वरकुटे बुद्रुक येथील रस्त्यावर पूल बांधण्यासाठीचा ५३ कोटी ८९ लाख रुपयांच्या प्रस्तावाचा समावेश आहे. असा एकूण सुमारे दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील दरडप्रवण ४४ गावांतील आपत्तीविषयक कामांचा सुमारे दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे, त्याचा प्राधान्यक्रम ठरविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार लवकरच प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव देण्यात येणार आहे.

- विठ्ठल बनोटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी