शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Mahatma Gandhi Jayanti: महात्मा गांधीजींचे २१ महिने वास्तव्य; वैयक्तिक वस्तू, समाधी स्थळे असं पुण्यातील 'आगाखान पॅलेस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:24 IST

यंदाच्या वर्षात तब्बल ३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी आगाखान पॅलेसला भेट दिली असून यामध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक लोक परदेशी आहेत

चंदननगर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आगाखान पॅलेसचे आकर्षण आजही भारतासह जगभरातील नागरिकांना आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षात तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी आगाखान पॅलेसला भेट दिली. यामध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक लोक हे परदेशी नागरिक असल्याची माहिती आगाखान पॅलेसची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यात महात्मा गांधीजी यांचे तब्बल २१ महिने वास्तव्य असलेले पुण्यातील एकमेव ठिकाण म्हणजे नगररस्त्यावरील आगाखान पॅलेस. येरवड्यापासून नगररस्त्याने पुढे आल्यावर रामवाडीगावजवळ आगाखान पॅलेस आहे.

इ.स १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या काळात ९ ऑगस्ट, १९४२ ते ६ मे, १९४४ दरम्यान महात्मा गांधीजींसह त्यांची पत्नी कस्तुरबा व सचिव महादेवभाई देसाई यांना या महालामध्ये नजर कैद ठेवण्यात आले. नजर कैदेत असताना कस्तुरबा गांधी (मृत्यू - २२ फेब्रुवारी १९४४) व महादेवभाई देसाई (मृत्यू - १५ ऑगस्ट १९४२) कालवश झाले. त्यांची समाधी स्थळे महाल परिसरात आहे. हा महल गांधीजींच्या आयुष्यात एक यथार्थ स्मरण आहे. महलामधील संग्रहालयात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाशी निगडित चित्र व छायाचित्रांचा मोठा संग्रह आहे. त्याचबरोबर, कपडे, भांडी, जपाची माळ, चपला, चरखा यांसारखे वैयक्तिक वापरातील वस्तू, तसेच सचिवांच्या मृत्युसमयी गांधीजींनी लिहिलेले पत्र अशा विविध वस्तू येथे पाहायला मिळतात, तसेच गांधीजींच्या अस्थींचे काही अवशेष, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांच्या समाधीजवळ ठेवण्यात आलेले आहेत.

तब्बल १६ एकर जागेतील महालामध्ये जवळपास एकरभर जागेत तीन मजली महाल असून, उर्वरित जागेत उद्यान आहे. प्रशस्त पार्किंग, शंभर वर्षे जुनी वडाची झाडे ही इतिहासाची आठवण करून देतात. हा पॅलेस नागरिकांना पाहण्यासाठी सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:३० दरम्यान खुला असतो. पंधरा वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे, तर त्यापुढील प्रत्येक नागरिकाला २५ रुपये शुल्क आहे, तर परदेशी नागरिकांनी ३०० रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच आकारले जाते. पुरातत्त्व विभागाचे गजानन मंडावरे व विद्याधर सूर्यवंशी यांच्या निरीक्षणाखाली तब्बल ३० कर्मचारी या मालाची देखभाल दुरुस्ती सुरक्षेचे काम पाहतात, तसेच महालामध्ये गांधी खादी ग्राम उद्योगांतर्गत खादीचे कपडे, पुस्तके उपलब्ध आहेत.

मोहम्मद शहा आगाखान यांनी १८९२ बांधला हा महाल

गांधी राष्ट्रीय स्मारक या नावाने प्रसिद्ध असलेल्या आगाखान महालाची निर्मिती शिया इस्माइली संप्रदायाचे ४८ वे इमाम सुलतान मोहम्मद शहा आगाखान (तिसरे) यांनी इ.स. १८९२ मध्ये १६ एकर जमिनीमध्ये केली. आजूबाजूच्या परिसरातील दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना रोजगाराचे साधन मिळावे, म्हणून त्यांनी हा महाल बांधला. महालाचे बांधकाम पाच वर्षे चालले व त्या काळी १२ लाख रुपये खर्च करण्यात आला. या अवधीत एक हजार लोकांच्या गरजा रोजगाराने पुरविल्या गेल्या व त्यासाठी त्यांना भरपूर मजुरी देण्यात आली. इ.स १९६९ मध्ये राजपुत्र शाह करीम अल् हुसेनिम आगाखान (चौथे) यांनी हा महाल आणि आसपासची जमीन, गांधीजी व त्यांच्या विचारांच्या स्मृतीत गांधी स्मारक निधी भारत सरकार यांना दान केली. आगाखान महाल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे राष्ट्रीय स्मारक आहे.

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिकhistoryइतिहासtourismपर्यटनInternationalआंतरराष्ट्रीय