शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

नीरा खोऱ्यातील धरणांत २४.०९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:11 AM

नीरा : जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिवनदायनी असलेले पुणे- ...

नीरा : जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिवनदायनी असलेले पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणात २६ मे अखेर ६०.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांत २४.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गतवर्षी नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने यंदा मेअखेरीस नीरा खोऱ्यातील धरणांत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा रब्बी हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात पाण्याचे आवर्तन सलग सुरू राहिल्याने याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नीरा खोऱ्यातील धरणांतील पाणीसाठ्याचा २६ मे रोजी आढावा घेतला असता नीरा देवघर धरणात १ हजार ८५५ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १५.८२ टक्के आहे. तर ब्रिटिशकालीन भाटघर धरणांत २ हजार ६२१ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ११.१५ टक्के आहे. तसेच, वीर धरणामध्ये ५ हजार ६५९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ६०.१५ टक्के आहे. तर गुंजवणी धरणांत १ हजार ५०६ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४०.८१ टक्के आहे.

एकंदरीत नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांत २६ मे रोजी सकाळी सहा वाजता २४.०९ टक्के पाणीसाठा उपयुक्त असल्याची माहिती नीरा पाटबंधारे कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी अशोक चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे.

वीर धरणमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे नीरा खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळच्या वेळी उसाच्या शेतीला पाणी मिळाले. नुकत्याच गहू, हरभरा, टोमॅटो, कांदा आदी पिकांची काढणी झालेल्या शेतात चारा पिकांचे उत्पादन घेता आले. त्यामध्ये कडवळ, मका, घास ही पिके घेता आली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

वीर धरणातून सासवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नीरा नदीवरील मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व एमआयडीसीला देखील उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. नीरा नदी व डाव्या कालव्यावरून पुरंदरमधील लपतळवाडी, मांडकी, जेऊर, पिंपरे (खुर्द), पिसुर्डी, गुळुंचे, कर्नलवाडी, राख आदी गावातील शेतकऱ्यांनी सहकारी उपसा सिंचन योजना राबवून शेतीसाठी पाणी नेले आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना ठिबक सिंचन करून फळ बागा लावल्या आहेत. या शेतकऱ्यांना ही या वर्षी पाण्याची चिंता राहिली नाही.

दरम्यान, नीरा उजवा कालव्यातून १ हजार ५५० क्युसेकने विसर्ग, तर नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. ३० जुन रोजी पर्यंत नीरा डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू राहणार आहे.

२६ नीरा

===Photopath===

260521\26pun_10_26052021_6.jpg

===Caption===

२६ नीरा