शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

घोडधरणात पक्त २.८७ टक्के पाणीसाठा

By admin | Published: March 17, 2016 3:05 AM

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोडधरणामध्ये आज अखेर २.८७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये शिरूर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आहे; मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे हे क्षेत्र घटत चालले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ५६३९ द. ल. घ. फू. एवढी असून, त्यापैकी २१७२ द. ल. घ.फू. मृत, तर ३४६७ द. ल. घ. फू. हा उपयुक्त पाणीसाठा मानला जातो. धरणाच्या उभारणीपासून आतापर्यंत संबंधित खात्याच्या वतीने धरणात साठलेला गाळ काढण्याची खास अशी व्यवस्था न झाल्याने धरणपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे.अलीकडच्या काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने झालेल्या पाच धरणांमुळे बरेचसे पाणी वरच अडविले जाते. त्यामुळे २००० सालानंतर हे धरण अभावानेच १०० % भरले आहे.याशिवाय धरणाच्या पाण्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखाना; तसेच रांजणगाव- कारेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखाने या पाण्यावर चालतात. हे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत व शिरूर -श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना या धरणामधून आहेत.मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे धरणामध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वडज धरणातून ५०० द . ल. घ. फू. पाणी घोडधरणात सोडण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २७० ते २८० द.ल.घ. फू. एवढेच पाणी प्रत्यक्ष धरणात पोहोचले. सध्या धरणात केवळ २.८७ टक्के म्हणजे, १४४ द.ल.घ. फू.एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. साठलेल्या गाळामुळे हा साठा कमी ठरू शकतो. त्याचप्रमाणे इनामगाव, शिरसगाव, गणेगाव या भागात असलेले पाचही बंधारे कोरडे आहेत. दि. ६ ते ११ मार्च या कालावधीत उजव्या व डाव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडले होते. (वार्ताहर)उन्हाळी आवर्तन सोडता येणे शक्य नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे सध्या या भागात असलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात असून, उन्हाळ्यात पिके पाण्याअभावी जळून जातील. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.