शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 11:07 AM

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात बैठक घेतली...

पुणे : समाविष्ट गावांतील मिळकतधारकांना जादा कर लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी-चिंचवडप्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर करू, असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. आता आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुळे म्हणाल्या, समाविष्ट गावातील मिळकतधारकांना जास्त कर लावण्यात आला आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी चिंचवडप्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. पण त्याची अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यासाठी नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करणार आहे. पालकमंत्र्यांनीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. म्हाळुंगे, रावेत भागात ४० मजली इमारती उभ्या राहत आहेत. या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही, असे असताना प्रचंड वेगात बांधकामे होत आहेत. त्यामुळे पुण्याचे पाणी, कचरा, रस्ते यांचे तज्ज्ञांकडून ऑडिट होणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होणार असे सुळे यांनी सांगितले.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम समन्वयाअभावी रखडले

‘महापालिकेत नगरसेवक नसल्याने नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणीच नाही, त्यामुळे समस्या गंभीर होत आहेत. या गावातील समस्यांवर मी दर महिन्याला बैठक घेऊन कामांचा पाठपुरावा करत आहे. कात्रज कोंढवा रस्ताच्या कामात महापालिका, राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

नगरसेवक नसल्यामुळे समस्या राहतात प्रलंबित

महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नसल्याने नागरिकांना हक्काची माणसेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपल्या कामांसाठी कोणाकडे जायचे, पाठपुरावा करायचा हेच त्यांचा समजत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या प्रलंबित राहात आहेत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMuncipal Corporationनगर पालिकाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड