शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र

By नितीन चौधरी | Updated: August 21, 2023 15:33 IST

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता

पुणे: फेब्रुवारीत कांदा दरात घसरण झाल्यानंतर राज्य सरकारने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुमारे ३ लाख ३६ हजार ४७६ शेतकरी अनुदानास पात्र ठरले असून पहिल्या टप्प्यात १० कोटी व त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या २३ जिल्ह्यांना सुमारे ४६६ कोटींचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

राज्यात फेब्रुवारीत कांद्याच्या दरात घसरण झाल्याने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार, प्रति क्विंटल ३५० रुपये तसेच जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकऱ्याला अनुदान देण्याचे ठरले होते. त्यानुसार पणन संचालनालयाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. राज्यातून ४ लाख १३ हजार ८३ शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज केले होते. छानणीनंतर ३ लाख ३६ हजार ४७६ शेतकरी पात्र ठरले आहेत. तर ७६ हजार ६०७ शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरले आहेत.

२२ कोटींचे वितरण झाले

यासाठी पणन संचालनालयाने राज्य सरकारकडे ८४४ कोटी ५६ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी राज्य सरकारने ४६५ कोटी ९९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. सातारा, सांगली, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नागपूर, रायगड, यवतमाळ, अकोला, वाशिम या दहा कोटी रुपयांपेक्षा कमी अनुदान असलेल्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याशिवाय १० कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाची रक्कम असलेल्या पुणे, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, कोल्हापूर या दहा जिल्ह्यातील उत्पादकानांना ५३.९४ टक्के या प्रमाणात अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. शिल्लक निधी उपलब्ध केल्यानंतर उर्वरीत पात्र लाभार्थ्यांस वितरीत करण्यात येणार आहे. १० कोटींपेक्षा कमी असलेल्या १३ जिल्ह्यांसाठी २२ कोटी ६० लाख ५१ हजार ९७४ रुपयांची गरज होती. त्यानुसार सर्व रक्कम वितरीत करण्यात आली. तसेच १० कोटी पेक्षा जास्त अनुदान असलेल्या १० जिल्ह्यात ४४३ कोटी ३७ लाख ३३ हजार ९९४ रुपयांची गरज होती. त्यापैकी ३७८ कोटी ५८ लाख ९५ हजार ८०७ रुपयांचे वाटप केले जाणार आहे.

पुण्यात ३६ कोटींचे होणार वितरण

पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना ५४.९४ टक्के प्रमाणात निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या ६६ कोटी ८९ लाख सहा हजार ६९८ एवढा निधी आवश्यक आहे. त्यानुसार, सध्या ३६ कोटी आठ लाख १९ हजार ६४५ एवढा निधी वितरीत केला जाणार आहे. तसेच ३० कोटी ८० लाख ८७ हजार ५३ रुपयांचा निधी शिल्लक राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीSocialसामाजिकGovernmentसरकारMarketबाजार